शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

SSC Result: लातूर जिल्ह्याचा ९७.६३ टक्के निकाल; मुलींची आघाडी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 20:07 IST

दहावीची असो की बारावीची परीक्षा असो, मुली मुलांपेक्षा पुढे असल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे.

लातूर : दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली असून, जिल्ह्याचा ९७.६३ टक्के निकाल लागला आहे. यंदा जिल्ह्यातून ३९ हजार ६१५ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंद झाली होती. त्यापैकी ३९ हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले असून, ३८ हजार १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण जिल्ह्याचा निकाल ९७.६३ टक्के लागला आहे. 

२१ हजार ६२२ मुले या परीक्षेसाठी सामोरे गेले होते. त्यापैकी २० हजार ९८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ९७.०६ उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. तर १७ हजार ४२२ मुली या परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. त्यापैकी १७ हजार १३४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ९८.३४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा १.७२ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून निकालात मुलींचा टक्का आहे. तो यंदाही कायम आहे. दहावीची असो की बारावीची परीक्षा असो, मुली मुलांपेक्षा पुढे असल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे. लातूर बोर्डात लातूर जिल्हा दुसऱ्यास्थानी असून, प्रथमस्थानी उस्मानाबाद जिल्हा (९७.८४) आहे. तर नांदेड जिल्हा तिसऱ्यास्थानी (९६.६८) टक्के आहे.

बोर्डाकडून झाले होते समुपदेशनगतवर्षी कोरोनामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा लेखी परीक्षा झाल्या. त्यात विद्यार्थी चांगले चमकले आहेत. बोर्डाने परीक्षेच्यापूर्वी समुपदेशन अभियान राबविले होते. मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, बोर्डाचा निकाल ९७ टक्के लागला आहे. राज्याच्या तुलनेत लातूर बोर्डाचा निकाल चांगला असल्याच्या प्रतिक्रिया शैक्षणिक वर्तुळात उमटल्या आहेत.

लातूर विभागात फक्त ६१ गैरप्रकारपरीक्षा कालावधीत लातूर विभागात ६१ गैरप्रकार झाले होते. त्यापैकी लातूर ३५, नांदेड ११ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १५ गैरप्रकार आढळून आले. या गैरप्रकारात परीक्षार्थ्यांचा निकाल राखीव असल्याचे बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

७७९२ विद्यार्थ्यांना ग्रेस गुणक्रीडा आणि कलेचे प्रमाणपत्र असलेल्या ७७९२ विद्यार्थ्यांना १५ ग्रेस गुण मिळाले आहेत. त्यात लातूर जिल्ह्यातील ४००६ विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा लाभ मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यात १६६३ परीक्षार्थ्यांना तर उस्मानाबाद जिल्ह्यात २०२३ परीक्षार्थ्यांना ग्रेस गुण मिळाले आहेत.

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनाची सोयमार्च, एप्रिल २०२२ च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करण्यासाठी परीक्षार्थ्याला उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करता येईल. त्यासाठी ३०० रुपये शुल्क ऑनलाईन भरून अर्ज करावा लागेल.

जिल्हानिहाय निकाललातूर ९७.६३उस्मानाबाद ९७.८४नांदेड ९६.६८लातूर जिल्हा निकाल दृष्टिक्षेपविशेष प्राविण्य २१७७३प्रथम श्रेणी ११४९२द्वितीय श्रेणी ४४९२पास श्रेणी ६२७

टॅग्स :laturलातूरSSC Resultदहावीचा निकाल