शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १११ गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST

उन्हाची तीव्रता सध्या वाढत असून, गतवर्षीच्या तुलनेत अधिग्रहण आणि टँकरच्या मागणी घट झाली आहे. पंचायत समिती स्तरावर ९३ गावे ...

उन्हाची तीव्रता सध्या वाढत असून, गतवर्षीच्या तुलनेत अधिग्रहण आणि टँकरच्या मागणी घट झाली आहे. पंचायत समिती स्तरावर ९३ गावे आणि १८ वाड्यानी प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये लातूर तालुक्यातील १३, औसा ७, निलंगा १२, रेणापूर २२, अहमदपूर ५१, चाकूर ११, शिरूर अनंतपाळ १, उदगीर ५ तर जळकोट तालुक्यातील ९ प्रस्तावांचा समावेश आहे. तहसील कार्यालय स्तरावर ९६ तर पंचायत समिती स्तरावर १६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. उपविभागीय अधिकारी यांनी २२ प्रस्तावांना अधिग्रहणाची परवानगी दिली असून, यामध्ये लातूर १, अहमदपूर १७ तर जळकोट तालुक्यातील १ प्रस्ताव आहे. सध्या २२ गावांना विहीर आणि विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ११ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार नवीन विंधन विहीर घेणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, प्रगतीपथावरील योजना पूर्ण करणे आदी योजनांचा समावेश आहे. पंचायत समिती स्तरावर प्राप्त झालेले प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे जात असून, त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मंजुरीने अधिग्रहण केले जात आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत अधिग्रहण आणि टँकरच्या मागणी घट झाली असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

रेणापूर, अहमदपूर, जळकोटमधून टँकरची मागणी...

टँकरने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी रेणापूर, अहमदपूर, जळकोट या तीन तालुक्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अधिग्रहण, टँकरचे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधित यंत्रणेच्या वतीने गावात जाऊन पडताळणी केली जात आहे. त्यानंतर सदरील प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत आहे.