शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संततधार; रेणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार आहे. सर्वच महसूल मंडळात दमदार पाऊस झाला असून ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. मांजरा ...

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार आहे. सर्वच महसूल मंडळात दमदार पाऊस झाला असून ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. मांजरा नदीवरील टाकळगाव बॅरेजमध्ये ७७,वांजरखेडा ८५, वांगदरी ८९, कारसा-पोहरेगाव ९०, नागझरी ९५, बिंदगीहाळ ८५, डोंगरगाव ८७,आणि होसुर बॅरेजेस १०० टक्के भरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे मांजरा नदीपात्रात १८५ किलोमीटर पर्यंत पाणी स्थिरावले आहे. जिल्ह्यातील लातूर,अहमदपूर, उदगीर, औसा,निलंगा,चाकूर,रेणापूर, देवणी, जळकोट आणि शि.आनंतपाळ तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात पाऊस झाल्याने पाण्याचा संचय मोठ्या प्रमाणात झाला आहे. सोमवारी रात्रभर पावसाची रिपरिप जिल्ह्यात सुरू होती. मंगळवारीही दिवसभर संततधार असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून रीना मध्यम प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. रेणापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यातील एक दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचेही महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. रविवारी रात्री आणि सोमवारी तसेच मंगळवारी झालेल्या पावसात रेणापूर तालुक्यामध्ये अनेक खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील अनेक गावांच्या शिवारातील ऊस आडवा झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे.

मांजरा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ...

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातही झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरण ६१.२ टक्के भरले असून त्यात ५०.६४ टक्के उपयुक्त साठा आहे. धरण क्षेत्रात कालपासून पाऊस होत असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. सध्या धरणात एकूण साठा १३६.७५२ दलघमी इतका झाला आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा ८९.६५२ दलघमी आहे. तर पाणी पातळी ६३९.९० मीटरवर आली आहे.

पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली...

लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब, मुरुड, लातूर एमआयडीसी आणि औसा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात १३६.७५२ दलघमी पाणीसाठा झाला असून, पाणी पातळी ६३९.९० मीटरवर आली आहे. एकूण पाणीसाठा ६१.२ टक्के झाला असून, उपयुक्त पाणीसाठा ५०.६४ टक्के झाला आहे. याशिवाय, मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा नदीवरील सर्वच बॅरेजेस भरले आहेत. यामुळे लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.