शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

उदगीरच्या समतानगरातील रेल्वे फाटक पाच दिवस बंद; ५ किमीचा वळसा पडणार

By हरी मोकाशे | Updated: September 26, 2023 17:51 IST

रेल्वे विभागाची अशी वारंवार कामे निघणार असल्याने उड्डाणपूल तयार करण्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.

उदगीर : रेल्वेच्या वाहतुकीमुळे शहरातील समतानगर भागातील रेल्वे फाटक सातत्याने बंद होते. त्यामुळे हैराण होत असलेल्या नागरिकांना आता पाच दिवस घरी जाण्यासाठी पाच किमीचा वळसा घालावा लागणार आहे. समतानगर भागातील मध्य रेल्वेचे फाटक, रूळ पटरी बदलण्यासाठी व रस्ता तयार करण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

शहरातील समतानगर भागातील रेल्वे फाटकामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो. या मार्गाचा नेत्रगाव, बनशेळकी, देवणी, येणकी, मानकी, संतोषी माता नगर, हनुमान नगर, गोपाळ नगर, क्रांतीनगरकडे जाण्यासाठी वापर केला करण्यात येतो. दरम्यान, मागील कांही दिवसांपासून रेल्वेची वाहतूक वाढल्यामुळे या मार्गावरील रेल्वे फाटक दिवसामध्ये वारंवार बंद करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये- जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या रस्त्याच्या परिसरात भाजी विक्रेते थांबतात. त्याचबरोबर रस्ता अरुंद असून ऑटोचालकही अस्ताव्यस्त वाहने उभी करतात. त्यामुळे अन्य वाहनधारकांसह नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे या रेल्वे मार्गावर उड्डाणपूल तयार करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, ती अद्यापही प्रलंबित आहे.

दरम्यान, मध्य रेल्वे विभागाने रेल्वेचे रूळ बदलणे व रस्ता तयार करण्याच्या कामासाठी मंगळवार ते शनिवार या कालावधीत म्हणजे सलग पाच दिवस हे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. परिणामी, रेल्वे पटरी पलिकडे असलेल्या समतानगर भागात जाण्यासाठी आता लातूर रोडवर असलेल्या उड्डाणपुलाला वळसा घालून जावे लागणार आहे. त्यामुळे पाच किमीचा फेरा पडणार आहे. रेल्वे विभागाची अशी वारंवार कामे निघणार असल्याने उड्डाणपूल तयार करण्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :laturलातूरrailwayरेल्वे