शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

उदगीरच्या समतानगरातील रेल्वे फाटक पाच दिवस बंद; ५ किमीचा वळसा पडणार

By हरी मोकाशे | Updated: September 26, 2023 17:51 IST

रेल्वे विभागाची अशी वारंवार कामे निघणार असल्याने उड्डाणपूल तयार करण्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.

उदगीर : रेल्वेच्या वाहतुकीमुळे शहरातील समतानगर भागातील रेल्वे फाटक सातत्याने बंद होते. त्यामुळे हैराण होत असलेल्या नागरिकांना आता पाच दिवस घरी जाण्यासाठी पाच किमीचा वळसा घालावा लागणार आहे. समतानगर भागातील मध्य रेल्वेचे फाटक, रूळ पटरी बदलण्यासाठी व रस्ता तयार करण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

शहरातील समतानगर भागातील रेल्वे फाटकामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो. या मार्गाचा नेत्रगाव, बनशेळकी, देवणी, येणकी, मानकी, संतोषी माता नगर, हनुमान नगर, गोपाळ नगर, क्रांतीनगरकडे जाण्यासाठी वापर केला करण्यात येतो. दरम्यान, मागील कांही दिवसांपासून रेल्वेची वाहतूक वाढल्यामुळे या मार्गावरील रेल्वे फाटक दिवसामध्ये वारंवार बंद करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये- जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या रस्त्याच्या परिसरात भाजी विक्रेते थांबतात. त्याचबरोबर रस्ता अरुंद असून ऑटोचालकही अस्ताव्यस्त वाहने उभी करतात. त्यामुळे अन्य वाहनधारकांसह नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे या रेल्वे मार्गावर उड्डाणपूल तयार करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, ती अद्यापही प्रलंबित आहे.

दरम्यान, मध्य रेल्वे विभागाने रेल्वेचे रूळ बदलणे व रस्ता तयार करण्याच्या कामासाठी मंगळवार ते शनिवार या कालावधीत म्हणजे सलग पाच दिवस हे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. परिणामी, रेल्वे पटरी पलिकडे असलेल्या समतानगर भागात जाण्यासाठी आता लातूर रोडवर असलेल्या उड्डाणपुलाला वळसा घालून जावे लागणार आहे. त्यामुळे पाच किमीचा फेरा पडणार आहे. रेल्वे विभागाची अशी वारंवार कामे निघणार असल्याने उड्डाणपूल तयार करण्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :laturलातूरrailwayरेल्वे