शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

उदगीरच्या समतानगरातील रेल्वे फाटक पाच दिवस बंद; ५ किमीचा वळसा पडणार

By हरी मोकाशे | Updated: September 26, 2023 17:51 IST

रेल्वे विभागाची अशी वारंवार कामे निघणार असल्याने उड्डाणपूल तयार करण्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.

उदगीर : रेल्वेच्या वाहतुकीमुळे शहरातील समतानगर भागातील रेल्वे फाटक सातत्याने बंद होते. त्यामुळे हैराण होत असलेल्या नागरिकांना आता पाच दिवस घरी जाण्यासाठी पाच किमीचा वळसा घालावा लागणार आहे. समतानगर भागातील मध्य रेल्वेचे फाटक, रूळ पटरी बदलण्यासाठी व रस्ता तयार करण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

शहरातील समतानगर भागातील रेल्वे फाटकामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो. या मार्गाचा नेत्रगाव, बनशेळकी, देवणी, येणकी, मानकी, संतोषी माता नगर, हनुमान नगर, गोपाळ नगर, क्रांतीनगरकडे जाण्यासाठी वापर केला करण्यात येतो. दरम्यान, मागील कांही दिवसांपासून रेल्वेची वाहतूक वाढल्यामुळे या मार्गावरील रेल्वे फाटक दिवसामध्ये वारंवार बंद करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये- जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या रस्त्याच्या परिसरात भाजी विक्रेते थांबतात. त्याचबरोबर रस्ता अरुंद असून ऑटोचालकही अस्ताव्यस्त वाहने उभी करतात. त्यामुळे अन्य वाहनधारकांसह नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे या रेल्वे मार्गावर उड्डाणपूल तयार करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, ती अद्यापही प्रलंबित आहे.

दरम्यान, मध्य रेल्वे विभागाने रेल्वेचे रूळ बदलणे व रस्ता तयार करण्याच्या कामासाठी मंगळवार ते शनिवार या कालावधीत म्हणजे सलग पाच दिवस हे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. परिणामी, रेल्वे पटरी पलिकडे असलेल्या समतानगर भागात जाण्यासाठी आता लातूर रोडवर असलेल्या उड्डाणपुलाला वळसा घालून जावे लागणार आहे. त्यामुळे पाच किमीचा फेरा पडणार आहे. रेल्वे विभागाची अशी वारंवार कामे निघणार असल्याने उड्डाणपूल तयार करण्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :laturलातूरrailwayरेल्वे