शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST

ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीसाठी करावी लागतेय वेटिंग लातूर : ग्रामीण भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे शेतीला पाणी देताना अडचणींचा ...

ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीसाठी करावी लागतेय वेटिंग

लातूर : ग्रामीण भागात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे शेतीला पाणी देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त झाले असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. महावितरणकडे पाठपुरावा करूनही वेळेवर ट्रान्सफाॅर्मर दुरुस्त करून मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. याकडे महावितरण प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एसटीच्या मालवाहतूक उपक्रमाला प्रतिसाद

लातूर : उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मालवाहतूक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या अकरा महिन्यांच्या काळात लातूर मंडळाला १ कोटी ८१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या २२ मालवाहतूक ट्रक सेवेत असून किराणा माल, शेतीविषयक खते, बियाणांची वाहतूक केली जात आहे. लातूर मंडळात औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर आणि लातूर या पाच आगारांचा समावेश आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महामंडळाने सांगितले.

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा

लातूर : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अहमदपूर, लातूर, रेणापूर, उदगीर, जळकोट आदी तालुक्यांतील गावांनी अधिग्रहणासाठी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर केले आहेत. तहसील कार्यालयातून पडताळणी केल्यानंतर या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार उपाययोजना राबिवल्या जात आहेत.

ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती मोहीम

लातूर : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती मोहीम तसेच लसीकरणाबाबत माहिती दिली जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुले, युवक तसेच गावातील ज्येष्ठांनी मिळून काही ठिकाणी अँटी कोरोना फोर्स कार्यान्वित केली आहे. दवंडीद्वारे विनाकारण बाहेर फिरू नये, अशा सूचना केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी मोहीमही राबविली जात आहे. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला लक्षणे दिसताच आरोग्य तपासणी करावी. तसेच मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी शेतशिवारात स्थलांतर केले असल्याचे चित्र आहे.