शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

शहर युवक काँग्रेसच्यावतीने मास्क, सॅनिटाझयर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST

दयानंद विज्ञान महाविद्यालयात सत्कार कार्यक्रम लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्रा. वैशाली चांडक, प्रा. अक्षता माने ...

दयानंद विज्ञान महाविद्यालयात सत्कार कार्यक्रम

लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्रा. वैशाली चांडक, प्रा. अक्षता माने यांनी गेट परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा व पीएच.डी. कोर्स वर्क पूर्ण केल्याबद्दल प्रा. श्वेता लोखंडे, प्रा. लहू काथवटे यांचा प्राचार्य जयप्रकाश दरगड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. ललित ठाकरे, डॉ. युवराज सारणीकर, डॉ. अण्णाराव चौगुले, डॉ. जमन अणगुलवार, प्रा. मंगेश आवाळे, प्रा. भाग्यश्री काळे, प्रा. नवनाथ ढेकणे, डॉ. गजानन बने, डॉ. रामशेट्टी शेटकार आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

जागतिक जल दिनानिमित्त न्यायालय परिसरात उपक्रम

लातूर : जागतिक जल दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय परिसरात पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी येळण्या बांधण्यात आल्या. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश तिवारी, जिल्हा विधि प्राधिकरणाच्या सचिव न्या. एस. डी. कंकनवाडी, न्या. यु. के. गंगणे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, बालाजी दळवी, संध्या कुलकर्णी, ज्योती चौधरी, ॲड. अजय कलशेट्टी, ॲड. सचिन पंचाक्षरी, ॲड. मीरा कुलकर्णी, ॲड. कल्पना भुरे, ॲड. किरण चिंते, ॲड. शहाबुद्दीन शेख, ॲड. फारुख शेख, ॲड. शिंदे, ॲड. देविदास बोरुळे, ॲड. सारिका वायबसे, ॲड. तृप्ती इटकरी, ॲड. हर्षदा जोशी, कैलास गरुडकर, विकास ढमाले, दगडू देशमाने, गजानन पांचाळ, बापू बेस्के आदींची उपस्थिती होती.

ऑनलाईन अभ्यासावर विद्यार्थ्यांचा भर

लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शाळांच्यावतीने ऑनलाईन अभ्यासक्रम राबविला जात आहे. परीक्षा जवळ आल्या असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आहे. ऑफलाईन वर्गांना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

लातूर : सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, दुपारच्यावेळी विजेचा लपंडाव होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नियमित बिल भरूनही वीज पुरवठा खंडित होत असल्याने ऐन उकाड्यात गैरसोय होत आहे. महावितरणने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.