शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Latur: लातूर जिल्ह्यात आणखीन २९९ रूग्णांची भर; ४२८ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:53 IST

३ हजार १८४ चाचण्या : सद्यस्थितीत ४ हजार ३७५ रूग्णांवर उपचार

लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरू असून, शनिवारी २९९ रूग्णांची भर पडली असून, उपचारानंतर ४२८ जण कोरोनामुक्त झाले. आता बाधितांचा आलेख ८७ हजार २१८ वर पोहोचला असून, यातील ८० हजार ८९९ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ४ हजार ३७५ रूग्ण सध्या उपचाराधीन आहेत.

आतापर्यंत १ हजार ९४४ जणांचा मृत्यू झाला असून, यातील २६ जणांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत १ हजार ३१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १४८बाधित आढळले असून, २ हजार १५३ जणांची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात १५१ पॉझिटिव्ह आढले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून २९९ रूग्ण आढळले आहेत. तरउपचारादरम्यान एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. त्यातील १३ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. पाच जणांना कोरोनासह अन्य व्याधी होत्या. तर आठ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी होते, असे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून सांगण्यात आले. सध्या उपचार घेत असलेल्या ४ हजार ३७५ रूग्णांपैकी५३४ रूग्ण आयसीयूमध्ये आहेत. २६ रूग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. २६१ रूग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. तर ७३२ रूग्ण मध्यम लक्षणाची परंतु, ऑक्सीजनवर आहेत. ३०२ रूग्णांमध्ये मध्यम लक्षणं असून ते विनाऑक्सीजनवर आहेत. ३ हजार ५४ रूग्णांना सौम्य लक्षणे आहेत. २ हजार ६५८ रूग्ण गृहविलगीकरणा तर १ हजार ७१७ रूग्ण विविध दवाखाने व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी सांगितले.

४२८ रूग्णांना रूग्णालयातून सुटीप्रकृती ठणठणीत झाल्याने ४२८ रूग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील २९४, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १७, सामान्य रूग्णालय उदगीर येथील ७, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील २०, ग्रामीण रूग्णालय अहमदपूर येथील ५, चाकूर येथील २, देवणी येथील १, कासारशिरसी येथील ३, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील २५, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील २२ अशा एकूण ४२८ जणांनी कोरोनावर मात केली.

मृत्यूचे प्रमाण कायम...मृत्यूचा दर गेल्या अनेक दिवसांपासून १.८ टक्के आहे. दररोज २५ च्या पुढून रूग्ण मृत्यू पावत आहेत. याबाबत आरोग्य विभाग चिंतेत असून, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७५ टक्के असून, रूग्ण दुपटीचा कालावधी २४ दिवसांवर गेला आहे, असेही जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस