शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

साकोळ प्रकल्पाची ३८ लाख ५० हजारांची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्प मागील तीन- चार वर्षांपासून भरला नव्हता. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीस अडचणी येत होत्या. ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्प मागील तीन- चार वर्षांपासून भरला नव्हता. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीस अडचणी येत होत्या. परिणामी, प्रकल्पाची ३८ लाख ५० हजारांची पाणीपट्टी थकीत राहिली होती. दरम्यान, यंदा परतीच्या पावसामुळे साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला. त्यामुळे मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नवीन उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने वसुली पथक सज्ज केले आहे. मार्चअखेरपर्यंत १५ लाख पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट प्रकल्प शाखेस देण्यात आले आहे.

तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्प परिसरातील गावांसाठी वरदान ठरला असून, प्रकल्पाच्या पाणीसाठ्यावर शेकडो हेक्टर्स जमीन सिंचनाखाली आली आहे. पाणीपुरवठा योजनेसह बागायती शेतीला प्रकल्पाचा मोठा फायदा होत आहे. मात्र, मागील तीन- चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडला होता. त्यामुळे पाणीपट्टी वसुली थांबली होती. मध्यम प्रकल्पाची ३८ लाख ५० हजारांची पाणीपट्टी थकीत राहिली आहे. यामध्ये मध्यम प्रकल्पावरून कार्यान्वित करण्यात आलेल्या वलांडीसह नऊ गाव पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे.

यंदा परतीच्या पावसामुळे साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला. परिणामी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर्सवर उसाची लागवड केली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या प्रकल्प शाखेच्या वतीने थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी पथक सज्ज केले आहे. या पथकास मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत १५ लाख रुपये पाणीपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. वसुली पथकातील अधिकारी, कर्मचारी वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी रात्रंदिवस थकबाकीदाराच्या घरी खेटे घालीत आहेत.

आजपर्यंत १३ लाख ६९ हजारांची वसुली...

पाणीपट्टी वसुलीसाठी प्रकल्प शाखेच्या वतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक सज्ज करण्यात आले असून, यामध्ये शाखाधिकारी प्रभाकर पाटील, कर्मचारी चंद्रहास माने, कुमार पाटील, बसवराज बिराजदार यांचा समावेश आहे. या पथकाने आजपर्यंत १३ लाख ६९ हजार रुपये वसुली केली आहे. उद्दिष्टाच्या जवळपास ९० टक्के वसुली झाली आहे.

मार्चअखेर व सणांमुळे सलग तीन सुट्या आल्याने शंभर टक्के वसुलीसाठी अडचण येत आहे. वसुलीसाठी थकबाकीदारांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे शाखाधिकारी प्रभाकर पाटील यांनी सांगितले.