शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

संगायोच्या २४५ लाभार्थ्यांचे २८ लाख शासनाकडे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

जळकोट : संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या २४५ लाभार्थ्यांचे २८ लाख रुपये अखर्चित राहिल्याने, तहसीलदारांच्या पत्रान्वये हे पैसे ...

जळकोट : संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या २४५ लाभार्थ्यांचे २८ लाख रुपये अखर्चित राहिल्याने, तहसीलदारांच्या पत्रान्वये हे पैसे बँकेच्या व्यवस्थापकांनी शासनाकडे परत पाठविले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत असून, सदरील अनुदान तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी भूमिहिन, विधवा, परित्यक्त्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या अंतर्गत लाभार्थ्यांना मासिक अनुदान दिले जाते. या अनुदानावर लाभार्थ्यांना उदरनिर्वाह, दवाखाना, औषधोपचार करण्यास मदत होते. मात्र, येथील २४५ लाभार्थ्यांनी वेळेत अनुदान बँकेतून न उचल्यामुळे हे पैसे अखर्चित राहिले.

वास्तविक पाहता, या कालावधीत कोरोनाचा संसर्ग होता. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे वाहनसेवा बंद होती. अशा परिस्थितीत काही जण आजारी पडले होते. त्यामुळे या लाभार्थ्यांना जळकोट येथे येणे शक्य झाले नाही, याशिवाय बहुतांश कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी संख्या कमीही होती. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने बहुतांश लाभार्थ्यांनी बँकेत जाणे टाळले. वेळेत अनुदानाचे पैसे न उचलल्याने ते तहसीलदारांच्या पत्रान्वये बँकेने शासनाकडे परत केले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

तीन महिन्यांत पैसे न उचलल्याने परत...

शासनाच्या नियमानुसार, अनुदानाची रक्कम तीन महिन्यांच्या आत उचलणे आवश्यक आहे. ती न उचलल्यास शासनाकडे परत करावी लागते. त्यानुसार, आम्ही बँकांना पत्र दिले होते. त्यामुळे ही रक्कम परत करण्यात आली आहे.

- संदीप कुलकर्णी, तहसीलदार.

तहसीलदारांच्या पत्रानुसार पैसे परत...

तहसीलदारांच्या पत्रानुसार आपण ही रक्कम परत केली आहे. लाभार्थ्यांनी ठरावीक कालावधीत पैसे उचलणे आवश्यक आहे, परंतु ते न उचलल्याने ही कार्यवाही करावी लागली आहे. २४५ लाभार्थ्यांचे जवळपास २८ लाख परत केले आहेत, असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक लोखंडे यांनी सांगितले.

सहानुभूतीपूर्वक विचार करावा...

निराधारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाकडे परत पाठविलेले अनुदानाचे पैसे वाटप करावे. त्यांना नवीन फॉर्म भरण्यास सांगण्यात येऊ नये, अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संग्राम पाटील हसुळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, बाजार समितीचे संचालक गजानन दळवे पाटील, दिलीप कांबळे, खादरभाई लाटवाले, गोविंद माने, आयुब शेख यांनी केली आहे.