शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे आरोग्य...

By admin | Updated: March 10, 2017 23:46 IST

आयुर्वेद

सर नुकताच जागतिक महिला दिन होऊन गेला. त्यामुळे तुम्ही आम्हाला महिला आरोग्याचा आयुर्वेदाने कसा विचार केला आहे ते सांगा,’’ दिप्ती म्हणाली.‘‘मुळात स्त्रीच्या जीवनाच्या तीन महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली कुमारिका, दुसरी प्रौढावस्था आणि तिसरी वृद्धावस्था. या तिन्ही टप्प्यांवर त्यांच्या आरोग्याच्या समस्या वेगळ्या आहेत. पुरुषांपेक्षासुद्धा स्त्रीच्या आरोग्याचा एका वेगळ्या पातळीवरून विचार करावा लागतो.’’मुलगी जेव्हा वयात येते त्यावेळी तिचा मासिक धर्म चालू होतो. (काही लोक त्याला मूर्खासारखं प्रॉब्लेम असंही म्हणतात.) ही एक चांगली नैसर्गिक क्रिया आहे. पुढे स्त्रीला मातृत्वासाठी तयार होण्यासाठी निसर्गाची ती एक खूण आहे. अनेकवेळा अशा मासिक धर्माच्यावेळी काही मुलींना पोटात दुखतं. खरं तर मासिकस्राव ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यानं त्यावेळी पोटात दुखायला नको. आपल्या डोळ्यातून पाणी येताना डोळे दुखतात का? किंवा आपण थुंकताना तोंड दुखतं का? मासिक स्रावसुद्धा इतक्या सहजतेने व्हायला हवा.आयुर्वेदाप्रमाणे ज्या एका वायूच्या प्रेरणेने हे स्राव बाहेर नेण्याचे कार्य होते; त्याच्या कामात अडथळा येतो. याला आज-काल पाहायला मिळणारं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे वाढणारी जाडी. आज-काल तरुण मुलींमध्ये जाडीचं प्रमाण वाढत आहे, ही निश्चितच चिंताजनक गोष्ट आहे. त्याहीपेक्षा काळजी करण्यासारखी गोष्ट ही आहे की, पोट, मांड्या, नितंब या भागातच चरबीचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुढे जाऊन वंध्यत्वासारखे आजार होऊ शकतात. सतत एका जागेला बसून राहणे, खेळ -खेळलेच तर बैठे खेळ खेळणे आणि व्यायामाचा अभाव ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत. या सर्वांच्याबरोबरीने आणखी एक अत्यंत विचार करायला लावणारे कारण आहे ते म्हणजे आपण तथाकथित ‘पौष्टिक’ आहार खातो. त्यामध्ये चरबीयुक्त (मेद वाढविणारे) आणि पिठूळ (साखर वाढविणारे) पदार्थ अधिक प्रमाणात जातात. फळं, चोथायुक्त पदार्थ खाण्यात जवळजवळ नसतातच. त्यामुळे शरीरावर चरबी वाढते.यासाठी वातशामक औषधे वापरण्यास आयुर्वेदाने सांगितले आहे. आयुर्वेदाने आणखी एक गोष्ट सांगितली आहे आणि ती मननीय आहे. अगदी लहानपणी गोवर किंवा कांजिण्या येऊन गेल्या असल्या तर पुढे जाऊन पाळीच्यावेळी पोटात दुखू शकते. त्या गोष्टींचा विचार करून चिकित्सा केली, तर पुढे कधीच पोट धरून लोळायची वेळ येत नाही. ‘‘खरं तर पोटात दुखू लागल्यास नुसतं गरम पाण्याची पिशवी घेऊन शेकलं तरी बरं वाटतं. काहीवेळा वेदनाशामक औषधे घेण्याची वेळ येते.’’ पंचकर्मापैकी स्नेहन, स्वेदन व बस्ती हे उपचार छानच उपयोगी पडतात. फक्त ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केले गेले पाहिजेत. स्त्रियांच्या इतर आजारांची माहिती पुढील भागात घेऊ.- वै. विवेक हळदवणेकर