शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मायबाप सरकार बांधावर कधी येणार, शेतकऱ्यांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:29 IST

महापूर, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडला असताना परतीच्या पावसाने त्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. महापुरातील नुकसानभरपाई अद्याप सरकारच्या तिजोरीत असल्याने परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? मायबाप सरकार पंचनाम्यासाठी बांधावर कधी येणार? पिके काढायची की पंचनाम्यासाठी तशीच ठेवायची? या चिंतेत शेतकरी आहे.

ठळक मुद्देमायबाप सरकार बांधावर कधी येणार, शेतकऱ्यांची आर्त हाकपिके काढायची की तशीच ठेवायची?

राजाराम लोंढेकोल्हापूर : महापूर, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडला असताना परतीच्या पावसाने त्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. महापुरातील नुकसानभरपाई अद्याप सरकारच्या तिजोरीत असल्याने परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? मायबाप सरकार पंचनाम्यासाठी बांधावर कधी येणार? पिके काढायची की पंचनाम्यासाठी तशीच ठेवायची? या चिंतेत शेतकरी आहे.साधारणत: कोल्हापूर जिल्ह्यात आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परतीच्या पावसाचा मुक्काम असतो. पडेल तिथेच पडेल, त्यात सातत्य नसायचे. त्यामुळे आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत खरिपाची काढणी होऊन रब्बीच्या पेरण्या सुरू होतात; पण यंंदा नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस पाठ सोडत नाही.

आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीप काढणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे; पण एकसारखा पाऊस तोही ढगफुटी झाल्याने खरीप काढणीचे धाडस होत नाही. जोरदार पावसाने उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. पिकांवर पाणी उभा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.महापूर व अतिवृष्टीने पिके गेली. त्यातून राहिलेली पिके परतीच्या पावसाने गेली. महापुरात बाधित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली; पण अद्याप याद्यांचा घोळच सुरू आहे. महापूर ओसरून तीन महिने झाले तरी कर्जमाफी याद्यांतच अडकल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे.

ऊसपीक महापुरात गेले, भात, सोयाबीन परतीच्या पावसाने घालविल्याने आता जगायचं कसं? या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहे. गेले दोन-तीन दिवस पावसाने काहीशी उसंत घेतल्याने उरली-सुरली पिके काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

काढणीपूर्वी पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करणे अपेक्षित होते; पण कृषी व महसूल विभागाची यंत्रणा अद्याप थंडच आहे. कुजलेली पिके काढायची की पंचनाम्याची वाट पाहत तशीच ठेवायची? मायबाप सरकार आमच्या बांधावर येणार तरी कधी? या विवंचनेत शेतकरी आहे.अस्मानी संकट पहिल्यांदाचशेतकऱ्यांना नैसर्गिक संकटे नवीन नाहीत; पण महापूर, अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस अशी एकामागून एक अस्मानी संकटे पहिल्यांदाच आली. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे; पण सरकारी यंत्रणेची गती पाहता तातडीने मदत मिळणे कठीण वाटते.

शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना सरकारी यंत्रणा सुस्तच आहे. पंचनामा होत नसल्याने पिके काढायची की नाही? हेच कळत नाही. राज्यकर्त्यांनी बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा तातडीने पंचनामे करून मदत द्यावी.- माणिक शिंदे ,शेतकरी, शिये

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसkolhapurकोल्हापूर