शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST

अमर पाटील : कळंबा स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या करवीर तालुक्यातील कळंबा ग्रामपंचायतीस अद्यापही स्वमालकीची प्रशस्त प्रशासकीय इमारत नाही. त्यामुळे ...

अमर पाटील : कळंबा

स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या करवीर तालुक्यातील कळंबा ग्रामपंचायतीस अद्यापही स्वमालकीची प्रशस्त प्रशासकीय इमारत नाही. त्यामुळे सरकारच्या अनेक पुरस्कारांची मानकरी असलेल्या या ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या इमारतीतूनच चालवला जात आहे.

पूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार हनुमान तालमीनजीकच्या स्वमालकीच्या कार्यालयातून होत होता. वाढत्या नागरीकरणामुळे जुनी इमारत अपुरी पडू लागली. ती इमारत जीर्ण झाल्याने १९८५ ला स्वमालकीची इमारत उभारण्याऐवजी ग्रामपंचायत प्रशासनाने प्राधिकरणाच्या रिकाम्या पडलेल्या कार्यालयात बस्तान बसवले.

महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व मलनिस्सारण मंडळाने कळंबा फिल्टर हाऊसच्या उभारणीसाठी शासन मालकीच्या ७५ गुंठे जागेत कार्यालयासाठी इमारत उभी केली. फिल्टर हाऊस पूर्णत्वास जाताच ही इमारत वापराविना पडून राहिली. १९८५ ला ग्रामपंचायतीने सदर इमारत प्रशासकीय वापरासाठी घेतली. आजमितीला येथे नगर भूमापन, तालुका कृषी महसूल कार्यालयांची दाटीवाटी झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला ही जागाही अपुरी पडू लागली आहे.

चौकट : प्रस्ताव रखडला

शासकीय मालकीच्या जागेत ग्रामपंचायतीची प्रशासकीय इमारत व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने महसूल विभागास प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, तलाठी कार्यालयासाठी एकूण क्षेत्राच्या चाळीस टक्के जागा सोडा, असा आग्रह महसूलने धरला आहे. या वादातच ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव रखडला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने जुनी पोस्ट ऑफिसची इमारत निर्गतीकरण करून नव्याने बांधण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. ज्याच्या मंजुरीचे काम प्रशासकीय पातळीवर रखडले आहे.

कोट : ग्रामपंचायतीची स्वतंत्र प्रशासकीय इमारत व्हावी यासाठी प्रशासकीय स्तरावर बराच पाठपुरावा करत असून महसूल विभागाच्या धोरणामुळे प्रत्येक वेळी काम रखडत आहे. इमारतीसाठी ग्रामपंचायत स्तरावर निधी उभा करून काम पूर्णत्वास जावे यासाठी प्रयत्नशील असून महसूल विभागाने समन्वयातून मार्ग काढून दिल्यास सर्वच प्रशासनाची गैरसोय टळणार आहे.

सागर भोगम, सरपंच, कळंबा