शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हलकर्णी पूर्व भागात पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: October 14, 2015 00:13 IST

पावसाअभावी पिकांचे नुकसान : सोयाबीन, भुईमूग उत्पादनात पन्नास टक्क्यांहून अधिक घट

एम. ए. शिंदे -- हलकर्णी परिसर हा गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील भाग. तालुक्याच्या पश्चिम भागातच गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमालीचे घटल्यामुळे पूर्व भाग तसा यंदा कोरडाच राहिला. परतीच्या पावसानेसुद्धा पाठ फिरल्यामुळे हलकर्णी परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जूनमध्ये पावसाने कधी नव्हे ती दमदार एंट्री केली होती. वेळेत पेरण्या पूर्ण होऊन पिकांची उगवणही चांगली झाली होती. त्यामुळे बळिराजा सुखावला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. शेतकऱ्यांनी जिवापाड कष्ट करून कशी पिके हाताला लागतील हेच पाहिले. आता भात पिकाची पोटरी गळ्यात अडकली आहे. कडक उन्हामुळे जमिनीला मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. आॅक्टोबर हिटला सुरुवात झाली सोयाबीन आणि भुईमूग ही या भागातील आर्थिक पिके आहेत, पण अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात पन्नास टक्क्यांहून अधिक घट झाली.हलकर्णी परिसरात तेरणी, नरेवाडी, येणेचवंडी हे तीन प्रकल्प आहेत. यापैकी येणेचवंडी हा लघु प्रकल्प जवळजवळ कोरडाच पडला आहे. येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच लघुप्रकल्पावर बसर्गे, नौकुड, येणेचवंडी येथील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. प्रकल्पात सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. हलकर्णीपासून जवळच इदरगुच्ची हे गाव आहे. या गावाला या नदीचा व लघु प्रकल्पाचा आधार आहे. तेरणी लघु प्रकल्पात साठवण क्षमतेच्या जवळपास पन्नास टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पातील पाण्यावर तेरणी आणि बुगडीकट्टी येथील नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. नरेवाडी लघु प्रकल्पावर बसर्गे आणि नरेवाडी नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे.विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी मोर्चे-आंदोलने केली. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनावर निवेदने स्वीकारण्यापलीकडे काहीच परिणाम झाला नाही. उपलब्ध पाण्याचा वापर भात, सोयाबीन, भुईमूग, मिरची या पिकांसाठीच शेतकऱ्यांनी केल्यामुळे यंदा ऊस पिकालासुद्धा अपुराच पाणीपुरवठा झाला आहे. नरेवाडी धरणात कायमस्वरूपी पाणीसाठा होण्यासाठी शासनाने नवीन स्रोत शोधावेत. पिण्याचे आणि शेतीचे पाणी प्रश्न गंभीर बनले आहेत. शासनाने ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना मदत द्यावी. हरळी कारखान्यापासून कालवा काढल्यास पूर्व भागातील २२ खेड्यांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. चित्री बंधाऱ्यात ८० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने उभ्या असलेल्या ऊस पिकाचा विचार करावा व उपसाबंदीचा आताच विचार करू नये. - जयकुमार मुन्नोळी, जि. प. सदस्य