शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यात १५०० ग्राम काँग्रेस कमिट्यांचे पुनर्गठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:50 IST

‘गाव तेथे काँग्रेस’ या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे १५०० ग्राम काँग्रेस कमिट्यांचे पुनर्गठण ३१ मार्चपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ग्रामकमिट्या स्थापन करण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर दिवसभर पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या. त्यामुळे दिवसभर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालय फुलून गेले होते.

ठळक मुद्देमार्चअखेरपर्यंत जिल्ह्यात १५०० ग्राम काँग्रेस कमिट्यांचे पुनर्गठणपालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती : तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांशी केली चर्चा

कोल्हापूर : ‘गाव तेथे काँग्रेस’ या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे १५०० ग्राम काँग्रेस कमिट्यांचे पुनर्गठण ३१ मार्चपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ग्रामकमिट्या स्थापन करण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर दिवसभर पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या. त्यामुळे दिवसभर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालय फुलून गेले होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्षाचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन त्यामध्ये ग्राम काँग्रेस कमिट्या, बूथ काँग्रेस कमिट्यांचे पुर्नवसन करण्याबाबत कार्यक्रम देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात काँग्रेस कमिटीमध्ये तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्रपणे बैठका घेऊन सूचना केल्या.ज्या गावात ११ ग्रामपंचायत सदस्य तेथे चार ग्रामकमिट्या, १५ सदस्य तेथे पाच कमिट्या, १७ सदस्य तेथे सहा ग्रामकमिट्या नेमण्याच्या सूचना केल्या. ग्रामकमिटीमध्ये तालुका व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा समावेश नसावा.

प्रत्येक गावामध्ये ग्राम काँग्रेस कमिटीचा फलक लावावा. फलकावर जिल्हाध्यक्ष, ब्लॉक कमिटी अध्यक्ष, ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्षांची नावे नमूद करावीत. प्रत्येक कमिटीने पक्षाचे काम म्हणून शासकीय योजनांसह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत घरोघरी माहिती पोहोचवावी, अशाही सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासोबत आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुुप्रया साळोखे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, हिंदुराव चौगुले, नामदेवराव कांबळे, जिल्हा कार्यालयीन सचिव संजय पवार-वाईकर, युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक थोरात, आदी उपस्थित होते.काँग्रेस कमिटीत कॉल सेंटरजिल्ह्यात सुमारे १५०० ग्राम काँग्रेस कमिट्यांचे पुनर्गठन दि. ३१ मार्चपर्यंत करण्याच्या सूचना केल्या. कमिटीने प्रत्येक महिन्याला अहवाल सादर करावा. त्यासाठी काँग्रेस कमिटीत कॉल सेंटर स्थापन करणार असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.नऊ तालुक्यांच्या बैठकाकरवीर, हातकणंगले, शिरोळ, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी या नऊ तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन काँग्रेस कमिटीत घेऊन पालकमंत्री पाटील यांनी सूचना केल्या. कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर, कागल, पन्हाळा, गगनबावडा यांच्या बैठका आठवड्यात घेण्यात येणार आहेत.जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यातालुकानिहाय चर्चा करताना आजरा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा मीनल इंगल यांनी, काँग्रेसच्या कार्यक्रमात जुन्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी तक्रार केली. त्यावर, सर्वांना विश्वासात घेऊन पक्षासाठी काम करायचे आहे, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.तालुका काँग्रेससाठी जागाप्रत्येक तालुक्यात तालुकानिहाय काँग्रेस कमिटी उभा करण्याचे धोरण आहे. त्यासाठी तालुकानिहाय जागा सुचवावी, अशीही सूचना मंत्री पाटील यांनी केली. काँग्रेस पक्षाला एका झेंड्याखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर