शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यात रात्रीच्यावेळी वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST

कसबा बावडा : कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा-शिये या रस्त्याची ओळख आहे. त्यामुळे या ...

कसबा बावडा :

कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा-शिये या रस्त्याची ओळख आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम असते. सायंकाळच्या वेळी मात्र या रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी वाहनचालकांबरोबरच बावडेकरांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. बावड्याच्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण, अस्ताव्यस्त पार्किंग, पाण्याचा हौद चौकात बसलेले विक्रेते, उसाची वाहने, तसेच सायंकाळच्या वेळी औद्योगिक वसाहतीतील नोकरदारांची सततची ये-जा यामुळे दररोज सायंकाळी बावड्यातील मुख्य रस्त्यावरून प्रवास करणे सर्वांसाठीचेच जिकिरीचे बनले आहे. डंपर, केएमटी बसेस आणि राष्ट्रीय मार्गावरून येणारी प्रवासी वाहने यामुळे या वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. त्यामुळे बावड्याच्या रिंगरोडचा प्रश्न कधी सुटणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या वाहतुकीच्या कोंडीमुळे सध्या बावड्यात आठवड्यातून एखादा-दुसरा किरकोळ अपघात नित्याचाच झाला आहे. आपापसात तडजोड करून ही अपघाताची प्रकरणे मिटविली जात आहेत. बावड्याचा भगवा चौक ते पिंजार गल्ली कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते, तर पाण्याचा हौद चौक व पाटील गल्लीच्या छत्रपती शिवाजीराजे चौकात वाहतुकीची कोंडी ठरलेली आहे. पाण्याच्या हौद चौकात फळ विक्रेते, फुले विक्रेते व भाजीपाला विक्रेते रस्त्यालगतच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. सणासुदीच्या काळात तर या चौकातून मार्ग काढणे एक दिव्य असते.

अतिक्रमण पथक गेले कुठे...

दिवसभर शहरभर रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई करून गाजावाजा करणारे मनपाचे अतिक्रमण पथक बावड्यातील रस्त्यालगत अतिक्रमणांवर कधी कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी, तसेच विक्रेत्यांनी स्वयंशिस्त लावली तरच येथील वाहतूककोंडीला आळा बसू शकतो. पाटील गल्लीच्या पूर्वेकडील रस्त्यावरून उसाने भरलेल्या बैलगाड्या जेव्हा मुख्य रस्त्यावर वळसा घेऊन कारखान्याकडे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काही वाहनधारक समोरून बैलगाडी येत असल्याचे पाहूनही आपली वाहने दामटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बैलगाडीला अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातामुळेही वाहतूक कोंडीची समस्या नित्याची बनली आहे.

चौकट :

भाजीमंडईचा वापर करा....

बावड्याच्या पाण्याचा हौद चौकात जे फळविक्रेते, फुले विक्रेते, भाजी विक्रेते बसतात त्यांनी दररोज भाजी मार्केट येथे बसण्यास सुरुवात केल्यास वाहतुकीची कोंडी निम्म्याने कमी होईल. यासाठी स्थानिक नगरसेवक व महापालिका अतिक्रमण विभागाने सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

फोटो: ०४ बावडा वाहतूक कोंडी

उसाने भरलेल्या बैलगाड्यांना वाहनचालक वाट न देता आपली वाहने दामटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.

(फोटो : रमेश पाटील, कसबा बावडा)