शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यात रात्रीच्यावेळी वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST

कसबा बावडा : कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा-शिये या रस्त्याची ओळख आहे. त्यामुळे या ...

कसबा बावडा :

कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा-शिये या रस्त्याची ओळख आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम असते. सायंकाळच्या वेळी मात्र या रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी वाहनचालकांबरोबरच बावडेकरांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. बावड्याच्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण, अस्ताव्यस्त पार्किंग, पाण्याचा हौद चौकात बसलेले विक्रेते, उसाची वाहने, तसेच सायंकाळच्या वेळी औद्योगिक वसाहतीतील नोकरदारांची सततची ये-जा यामुळे दररोज सायंकाळी बावड्यातील मुख्य रस्त्यावरून प्रवास करणे सर्वांसाठीचेच जिकिरीचे बनले आहे. डंपर, केएमटी बसेस आणि राष्ट्रीय मार्गावरून येणारी प्रवासी वाहने यामुळे या वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. त्यामुळे बावड्याच्या रिंगरोडचा प्रश्न कधी सुटणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या वाहतुकीच्या कोंडीमुळे सध्या बावड्यात आठवड्यातून एखादा-दुसरा किरकोळ अपघात नित्याचाच झाला आहे. आपापसात तडजोड करून ही अपघाताची प्रकरणे मिटविली जात आहेत. बावड्याचा भगवा चौक ते पिंजार गल्ली कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते, तर पाण्याचा हौद चौक व पाटील गल्लीच्या छत्रपती शिवाजीराजे चौकात वाहतुकीची कोंडी ठरलेली आहे. पाण्याच्या हौद चौकात फळ विक्रेते, फुले विक्रेते व भाजीपाला विक्रेते रस्त्यालगतच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. सणासुदीच्या काळात तर या चौकातून मार्ग काढणे एक दिव्य असते.

अतिक्रमण पथक गेले कुठे...

दिवसभर शहरभर रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई करून गाजावाजा करणारे मनपाचे अतिक्रमण पथक बावड्यातील रस्त्यालगत अतिक्रमणांवर कधी कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी, तसेच विक्रेत्यांनी स्वयंशिस्त लावली तरच येथील वाहतूककोंडीला आळा बसू शकतो. पाटील गल्लीच्या पूर्वेकडील रस्त्यावरून उसाने भरलेल्या बैलगाड्या जेव्हा मुख्य रस्त्यावर वळसा घेऊन कारखान्याकडे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काही वाहनधारक समोरून बैलगाडी येत असल्याचे पाहूनही आपली वाहने दामटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बैलगाडीला अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातामुळेही वाहतूक कोंडीची समस्या नित्याची बनली आहे.

चौकट :

भाजीमंडईचा वापर करा....

बावड्याच्या पाण्याचा हौद चौकात जे फळविक्रेते, फुले विक्रेते, भाजी विक्रेते बसतात त्यांनी दररोज भाजी मार्केट येथे बसण्यास सुरुवात केल्यास वाहतुकीची कोंडी निम्म्याने कमी होईल. यासाठी स्थानिक नगरसेवक व महापालिका अतिक्रमण विभागाने सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

फोटो: ०४ बावडा वाहतूक कोंडी

उसाने भरलेल्या बैलगाड्यांना वाहनचालक वाट न देता आपली वाहने दामटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.

(फोटो : रमेश पाटील, कसबा बावडा)