शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यांमुळे देशातील अन्न सुरक्षेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST

महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेतर्फे राज्यव्यापी शेतकरी संवाद यात्रेच्या गडहिंग्लज येथे सांगता समारोहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत ...

महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेतर्फे राज्यव्यापी शेतकरी संवाद यात्रेच्या गडहिंग्लज येथे सांगता समारोहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कॉ. सुखदर्शन सिंग (पंजाब), बिहारचे आमदार कॉ. सुदामा प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. सिंग म्हणाले, कृषी कायद्यांमुळे देशातील असंख्य गरिबांना स्वस्त दरात मिळणारे रेशन बंद होणार आहे. सरकारी शाळांमधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनावरही केंद्र सरकारने टाच आणली आहे.

अदानी, अंबानींच्या गोदामातील अन्नधान्य चढ्या दराने विकत घेणे गरीब जनतेला परवडणारे नाही. त्यामुळे देशात उपासमारीची वेळ आणण्याचे धोरण सरकार राबवत आहे. सुखदर्शन सिंग म्हणाले, अनेक महिन्यांपासून शेतकरी शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करत आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची तसदीदेखील केंद्र सरकार घेत नाही; परंतु शेतकरी थकलेले नाहीत आणि थांबलेलेही नाहीत ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. देशातील शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे शासनाने तातडीने रद्द करावेत अन्यथा शेतकरी आंदोलनाबरोबरच देशात ‘भाजपामुक्त भारत’चीही मोहीम राबवावी लागेल.

यावेळी कॉ. दत्तात्रय अत्याळकर, राजेंद्र बावके, करणसिंह कोकणे, सुभाष काकुस्ते, किशोर ढमाले, अजित पाटील, बी. के. आम्रे, गोपाळ पाटील, विजय निकम, अतुल दिघे, शांताराम पाटील, अनंत कुलकर्णी, सुधाकर सावंत, सुवर्णा तळेकर, अमृत कोकितकर, धोंडीबा कुंभार, रामजी देसाई, दौलती राणे, गोपाळ गावडे, कृष्णात चौगुले, नारायण राणे, बलदेव चौगुले, एस. जी. पाटील आदी उपस्थित होते.

साठवणुकीवर निर्बंध हवा

व्यापारी आणि भांडवलदार अन्नधान्य साठवणुकीवर शेतकरी कायद्यांमुळे निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे अमर्याद साठवणूक केल्यामुळे त्यांची मक्तेदारी निर्माण होऊन शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची लुबाडणूक करण्यास त्यांना मुभा मिळेल त्यासाठी गोदामात अन्नधान्य साठवणुकीवर शासनाचे नियंत्रण आणि निर्बंध हवेत, असेही राजाराम सिंग यांनी सांगितले.

शेतीमुळेच अर्थव्यवस्था कणखर

शेती हा देशाचा परंपरागत व्यवसाय असून, अनेकवेळा आर्थिक मंदीपासून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम याच व्यवसायाने केले आहे. शेतकरी तोट्यात जाऊनदेखील हा व्यवसाय करण्याचे धाडस करत आहे. आणि देशाची अर्थव्यवस्था टिकवत आहे. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था कणखर बनली आहे, असेही राजाराम सिंग यांनी स्पष्ट केले.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील पत्रकार परिषदेत कॉ. राजाराम सिंग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बिहारचे आमदार कॉ. सुदामा प्रसाद, कॉ. सुखदर्शन सिंग, दत्तात्रय अत्याळकर, करणसिंह कोकणे आदी उपस्थित होते.

क्रमांक : २००७२०२१-गड-०८