शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

...तर आयुक्तांचा पाणीपुरवठा तोडू

By admin | Updated: August 20, 2016 00:13 IST

शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा : नियाज खान यांचा प्रशासनाला इशारा

कोल्हापूर : शहरवासीयांना रोज मुबलक पाणीपुरवठा होण्याकरिता दोन दिवसांत उपाययोजना कराव्यात, अन्यथा आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निवासस्थानाचा पाणीपुरवठा तोडण्यात येईल, असा इशारा शिवसेना गटनेते नियाज खान यांनी शुक्रवारी शिवसेनेने महानगरपालिकेवर काढलेल्या मोर्चावेळी दिला. महानगरपालिकेने सुरू केलेली स्पॉट बिलिंग पद्धत तातडीने बंद करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोल्हापूर शहरास होणारा एक दिवस आड पाणीपुरवठा बंद करून तो रोज करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेने शुक्रवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चात पुरुषांसह महिलासुद्धा मोठ्या संख्येने घागरी, बादल्या घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरापासून मोर्चाला सुरुवात झाली. महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर मोर्चा अडविण्यात आला. मोर्चाच्यावतीने एका शिष्टमंडळाने महापौर अश्विनी रामाणे व आयुक्त पी. शिवशंकर यांची एकत्र भेट घेतली. शिष्टमंडळात शिवसेनेचे गटनेते नियाज खान, नगरसेवक अभिजित चव्हाण, राहुल चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे यांच्यासह मंगल साळोखे, पूजा भोर, रूपाली कवाळे, मेघना पेडणेकर, अनिल पाटील, विशाल देवकुळे, जयवंत हारूगले, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, महेश उत्तुरे आदींचा समावेश होता. महापौरांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यावेळी स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख हेदेखील उपस्थित होते. येत्या दोन दिवसांत जर शहराला पूर्ववत रोज पाणीपुरवठा केला नाही, तर शिवसैनिक आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निवासस्थानचा पाणीपुरवठा बंंद करतील, असा इशारा नियाज खान यांनी दिला. उपनगर अभियंता रावसाहेब चव्हाण हे पाणीपुरवठा विभागाच्या कामाला न्याय देत नाहीत. कधी फोन घेत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांनी केली. शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शनिवारच्या महासभेत निर्णय घेऊन पूर्ववत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन महापौर रामाणे यांनी दिले. (प्रतिनिधी)पाणीपुरवठा सुरळीत सुरूगेले तीन दिवस जलवाहिनी दुरुस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला शहरातील काही उपनगरे तसेच ई वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवारपासून सुरू करण्यात आला. तरीही काही परिसरांत कमी दाबाने पाणी मिळाले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी टॅँकरद्वारे पाणी द्यावे लागले. आज, शनिवारपासून पुरेशा दाबाने पाणी दिले जाईल, असे महापलिकेचे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. जलवाहिनी जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून शिंगणापूर उपसा केंद्रातून पाणी उचलण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कमी दाबाने पाणी उचलण्यात आले. दुपारनंतर ही गती वाढविण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाला. तथापि, पाणी कमी दाबाने मिळत होते. शनिवारपासून पुरेशा दाबाने पाणी मिळेल, असा विश्वास महापालिका सूत्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात २४ टॅँकरच्या माध्यमातून ९० फेऱ्या करून पाणी देण्यात आले.