शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर कृषीमंत्री दिसले नाहीत, सत्तेच्या वाटणीत महायुतीला रस; काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:55 IST

झोपलेल्या सरकारला विरोधी आघाडीने जागे केले

कोल्हापूर : मान्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री व इतर कोणताही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसला नाही. महायुतीच्या सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या वाटणीत अधिक रस आहे, अशी टीका कँाग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली. विरोधी पक्ष म्हणून आम्ही झोपलेल्या सरकारला जागे करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.आमदार पाटील म्हणाले, राज्यात पावसाचा आठ दिवस अलर्ट होता. यावेळी सुरू असलेल्या कृषी सहायकांचा संपाकडे सरकारने दुर्लक्ष केले. डोक्यावरून पाणी वाहून गेल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य केल्या.अवकाळी पावसामुळे सर्व उन्हाळी पीक वाहून गेली आहेत. त्याचे तातडीने पंचनामे करून मदत मिळाली पाहिजे. पावसामुळे मुंबईतील मेट्रो तीनची काय अवस्था झाली हे जगाने पाहिले आहे. काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. इतकी वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे योग्य नाही. वीस वर्षांचा माझा अनुभव आहे, आम्ही कधी फोन केला, तर राहुल गांधी यांची वेळ मिळाली नाही, असे झाले नाही.

जागतिक बँकेच्या प्रकल्पातून पूर कमी होणे अवघडआमदार पाटील म्हणाले, जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या निधीतून पूर नियंत्रणासाठीच्या उपाय योजनांचा आराखडा तयार केला आहे. यातून पूर कमी होणे अवघड आहे. पुराचे पाणी उपसून विदर्भाला देणेही अशक्य आहे. अलमट्टी धरण उंचीप्रश्नी बैठक झाली. त्याला विरोधातल्या एकाही आमदाराला बोलावले नाही. त्यामुळे आम्ही आज, गुरुवारी सकाळी महाविकास आघाडीचे आमदार सरकारला म्हणणे देणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वांची अस्मिताराष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्व सीबीएससी अभ्यासक्रमांमधून कमी करणे हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासक्रमांमधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली पाहिजे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तारखेच्या वादात न पडता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुतीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलFarmerशेतकरीElectionनिवडणूक 2024