शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

लोकसभा जागा वाटपाची चर्चा दिल्ली अधिवेशनानंतर : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 12:56 IST

लोकसभेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्यावर राहूल गांधी आणि माझ्यामध्ये झालेल्या चर्चेत शिक्कामोर्तब झाले आहे. आता जागा वाटपाबाबतची चर्चा दिल्लीतील अधिवेशन संपल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी दिली.

ठळक मुद्दे लोकसभा जागा वाटपाची चर्चा दिल्ली अधिवेशनानंतर : शरद पवारराष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल करणार चर्चा

कोल्हापूर : लोकसभेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्यावर राहूल गांधी आणि माझ्यामध्ये झालेल्या चर्चेत शिक्कामोर्तब झाले आहे. आता जागा वाटपाबाबतची चर्चा दिल्लीतील अधिवेशन संपल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवारयांनी दिली.पवार म्हणाले, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी आणि माझी तीन वेळा बैठक झाली. त्यातून महाराष्ट्रात आघाडी करण्याबाबत एकमत झाले. मात्र जागा वाटपाबाबत अजून चर्चा झाली नाही. ही चर्चा दिल्लीतील अधिवेशन झाल्यानंतर सुरू होईल.

यामध्ये कॉंग्रेसकडून अशोक गेहलोत, अशोक चव्हाण तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल हे चर्चेमध्ये भाग घेतील. अगदीच यातून काही जागांबाबत मतभेद निर्माण झालेच तर ते आमच्या वरिष्ठांच्या पातळीवर सोडवले जातील असेही यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.देशपातळीवर भाजपच्याविरोधात एकच आघाडी करण्यासाठी खूप मर्यादा असल्याचे सांगून पवार म्हणाले, माझी याबाबतची सुचना वेगळी आहे. कारण देशपातळीवर आघाडी केल्यानंतर आमच्या पक्षाने ताकद नसलेल्या पंजाबमध्ये जागा मागणे उचित होत नाही. परंतू तशा मागण्या होतात आणि मग चर्चा पुढे जात नाही. त्यापेक्षा त्या त्या राज्यातील कॉंग्रेस आणि प्रादेशिक पक्षांनी एकत्र आल्यास प्रत्येक राज्यात एक मजबूत विरोधी आघाडी होईल असे माझे मत आहे.

नेता जाहीर करायला हरकत नाहीज्या त्या पक्षाने निवडणुकीआधी आपला नेते जाहीर करणे यात गैर काहीही नाही. कॉंग्रेसने जर राहूल गांधीं आमचे नेते म्हटले किंवा समाजवादी पक्षाने अखिलेश यादव आमचे नेते आहेत असे म्हटले तर त्यात वावगे काही नाही. पंतप्रधानपदाचा नेता हा निवडणूक झाल्यानंतर ठरत असतो. तोपर्यंत पक्षांनी आपल्या नेत्यांची नावे घेणे गैर नाही असेही पवार म्हणाले. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस