शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

वाहनांच्या टायरची घ्या मुलाप्रमाणे काळजी, नियमित हवा, देखभाल गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 10:35 IST

वारंवार टायर फुटून चारचाकींचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रमाणित दिलेल्या इतकीच हवा भरणे, ताशी ५० कि. मी.ची वेगमर्यादा पाळूनच वाहन हाकणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न भरणे, आदी प्रकारची काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात, असे मत अभ्यासकांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देटायरची घ्या मुलाप्रमाणे काळजी, नियमित हवा, देखभाल गरजेची वेगमर्यादा ताशी ५० कि. मी. हवी

कोल्हापूर : वारंवार टायर फुटून चारचाकींचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रमाणित दिलेल्या इतकीच हवा भरणे, ताशी ५० कि. मी.ची वेगमर्यादा पाळूनच वाहन हाकणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न भरणे, आदी प्रकारची काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात, असे मत अभ्यासकांतून व्यक्त होत आहे.बेळगाव येथे औरंगाबादहून गोव्याकडे जाण्यासाठी निघालेली चारचाकी टायर फुटून त्यातील सर्वच्या सर्व सातजण ठार झाले, अशा एक ना अनेक घटना राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी वारंवार घडत आहेत. एकूणच चारचाकी चालविणाऱ्यांच्या ऐरणीवर असलेल्या हा विषय आहे; त्यामुळे टायर हे चारचाकीचे महत्त्वाचे अंग आहे.

विशेष म्हणजे दीर्घ प्रवासासाठी जाताना वाहनांच्या टायर तपासणी आवश्यक आहे. यात हवा, व्हील अलायमेंट, टायरचे थ्रेड, आदींबाबत वाहन चालकाने जागरूक असणे गरजेचे आहे. तरच अपघात टाळता येऊ शकतात आणि वित्त व मनुष्यहानी टाळता येऊ शकते.काय करू नये

  1.  प्रवास करताना गाडीच्या क्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरून प्रवास करू नये
  2.  एकसारखा दीर्घ प्रवास करू नये.
  3.  वाहन चालविताना खड्ड्यातून वेगाने जाऊ नये.
  4. ५० कि. मी. प्रतितासांपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवू नये.
  5.  टायरचे थ्रेड निघण्यास सुरुवात झाल्यानंतर किंवा तीन वर्षांपेक्षा अधिक काळचा टायर असल्यास तपासणी न करता प्रवास करू नये.
  6. टायर हार्ड झाल्यास प्रवास करू नये.
  7. चार चाकांपैकी एका चाकातील हवा कमी होते, असे जाणवल्यास वाहनचालकाने वाहन रस्त्याकडेला घेणे आवश्यक आहे. टायर फुटण्याअगोदर वाहनाचा चारपैकी एक कोपºयात दाब कमी झाल्यासारखा जाणवल्यास तत्काळ वाहन बाजूला घेणे.

टायरची काळजी अशी घ्या

  1. वर्षाला १० ते १५ हजार मैल प्रवास केल्यास टायर बदलणे गरजेचे आहे.
  2.  टायरमधील हवा नियमित तपासणे.
  3. टायरचे स्टड, थे्रड चांगले आहेत की नाही हे पाहणे.
  4. क्षमतेपेक्षा जादा भार वाहनांवर पडेल, असे कृत्य करू नये.
  5. नियमित व्हील अलायमेंट करावे.
  6. घाट, ओबडधोबड रस्त्यावरून प्रवास करताना वाहन काळजीपूर्वक चालविणे.
  7.  वाहनांची योग्य वेग मर्यादा पाळणे.
  8.  दीर्घ प्रवास करून आल्यानंतर वाहनातील टायरची हवा तपासून घेणे.
  9. ६०००-८००० कि. मी. प्रवास झाल्यानंतर टायर फिरवून बसविणे गरजेचे आहे.
  10.  पुढील टायर २० हजार मैल, तर मागील टायर ४० हजार मैल प्रवास झाल्यास बदलणे गरजेचे आहे.
  11. भाडे तत्त्वावर वाहन घेतल्यानंतर त्या वाहनातील टायर प्रथम तपासून प्रवासाला सुरुवात करणे.

महिन्यातून किमान एकवेळा तरी चारचाकी चालकाने वाहनांच्या सर्व टायर्स तज्ज्ञांकडून तपासून घेणे गरजेचे आहे. विशेषत: २० हजार मैल प्रवास झालेल्या टायरबाबत अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. टायरमधील हवेचे प्रमाण योग्य ठेवणे अत्यावश्यक बाब आहे.- तुकाराम खोंदळ, टायर विक्रेते, कोल्हापूर 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर