शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीचा मोर्चा ठरला अभूतपूर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:28 IST

स्वाभिमानीचा मोर्चा ठरला अभूतपूर्व * पूरग्रस्तांच्या प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक * राज्यभरातून मिळाला मोर्चाला पाठिंबा शिरोळ / कुरुंदवाड / ...

स्वाभिमानीचा मोर्चा ठरला अभूतपूर्व

* पूरग्रस्तांच्या प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक

* राज्यभरातून मिळाला मोर्चाला पाठिंबा

शिरोळ / कुरुंदवाड / नृसिंहवाडी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जलसमाधी मोर्चा नृसिंहवाडी येथे येणार असल्याने सकाळपासूनच पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती. नृसिंहवाडीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नृसिंहवाडी-कुरुंदवाड पुलावर कडे करून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. राज्यातील विविध भागातून संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होते. ऊस परिषदेप्रमाणेच पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी निघालेल्या पदयात्रेलादेखील तितकाच प्रतिसाद मिळाल्याने हा मोर्चा अभूतपूर्व ठरला.

पूरग्रस्तांना २०१९ च्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळावी, शासनाने जाहीर केलेली नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळावेत या मागणीसाठी प्रयाग चिखली येथून गेले पाच दिवस सुरू असलेला पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चाला सकाळी अब्दुललाट येथून प्रारंभ झाला. हेरवाड (ता. शिरोळ) येथे दुपारचे जेवण करून नृसिंहवाडीच्या दिशेने मोर्चा आगेकूच झाला. मोर्चामध्ये हजारो शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. गावागावात रांगोळी घालून मोर्चाचे जंगी स्वागत करण्यात येत होते. राजू शेट्टी यांचे घरोघरी महिलांनी औक्षण करत व फुलांच्या पाकळ्या डोक्यावर उधळून स्वागत करत होते.

दुपारी साडेतीन वाजता मोर्चा कुरुंदवाड शहरात आला. यावेळी ओंकार चौकात सभा झाली. त्यानंर मोर्चा नृसिंहवाडीच्या दिशेने सुरू झाला. कुरुंदवाड ते नृसिंहवाडी या रस्त्यावर दुतर्फा पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुरूंदवाड नदी घाटाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बॅरिकेटस लावून बंद करण्यात आले होते. अग्निशमन दल व रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली होती.

राजू शेट्टी यांच्या विजयाच्या घोषणा देत हलगीच्या निनादात सायंकाळी पाचच्या सुमारास मोर्चा नृसिंवाडीत दाखल झाला. पूरग्रस्तांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार निर्णय न घेतल्याने स्वाभिमानीचे आंदोलन हाताळण्याचा ताण पोलीस प्रशासनावर होता. त्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत पोलिसांना रस्त्यावर उभे राहून बंदोबस्त करावा लागला.

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानीने आक्रोश मोर्चा काढला होता. चार दिवस चाललेल्या या मोर्चात मर्यादित संख्या होती. मात्र, अखेरच्या दिवशी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे अभूतपूर्व मोर्चा झाला.

आक्रोश मोर्चाला रविवारी सकाळी अब्दुललाट येथील ग्रामदैवत कल्लेश्वर मंदिरात दर्शनाने सुरुवात झाली. लाट ते हेरवाड असा ७ किलोमीटरचा प्रवास करून हेरवाड येथे दुपारच्या भोजनासाठी दाखल झाला. हेरवाड येथे मोर्चा येताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत व महिलांनी औंक्षण करत शेट्टी यांचे स्वागत केले. चार वाजता कुरुंदवाड शहरात मोर्चा आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा दिनकरराव यादव पंचगंगा पुलावरून सायंकाळी पाचच्या सुमारास नृसिंहवाडीत पोहोचला.