शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

सुन्या..सुन्या.. या बाजारात! ग्राहकांची प्रतिक्षा

By admin | Updated: August 24, 2015 00:25 IST

मंदिचे सावट : दरही घसरले, पावसाची दडी, उसाची बिले अडकल्याचा परिणाम

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मारलेली दडी, साखर कारखान्यांनी उसाची बिले काढली नसल्याने फळ व कडधान्य मार्केटमध्ये कमालीची शांतता आहे. श्रावण महिना सुरू होऊन आठ दिवस झाले तरी फळांना फारशी मागणी दिसत नाही. गतवर्षीच्या तुलनेत निम्याहून कमी उलाढाल होत असल्याने सर्वत्र मंदीचे सावट दिसत आहे. भाजीपाला मार्केटमध्ये जेमतेम आवक असली तरी भाज्यांचे दर कमालीचे घसरले आहेत. श्रावण महिन्यात फळे, भाजीपाल्यांसह फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते पण यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सर्वच मार्केटवर परिणाम झाला आहे. फळ मार्केटमध्ये आवकही मर्यादित आहे, त्याबरोबर मागणीही नसल्याने मंदी दिसत आहे. मोसंबीची औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर येथून होणारी आवक अद्याप झालेली नाही. परिणामी बंगलोर, चेन्नई येथून होणाऱ्या आवकच सध्या बाजारात दिसत आहे. सीताफळची आवक सुरू आहे. पण सांगली, सोलापूर जिल्ह्यांत पाऊस नसल्याने आवकेवर मर्यादा आल्या आहेत. घाऊक बाजारात सीताफळाचा दर प्रति ढीग ५० ते २५०० रुपयांपर्यंत आहे. कडधान्य मार्केटमध्ये मंदी जाणवत आहे. साखरेचा दर स्थिर झाला असून किरकोळ बाजारात २८ रुपये किलोचा दर आहे. सरकी तेल, शाबू, मूग, मूगडाळीच्या दर स्थिर राहिले आहेत. भाजीपाला मार्केट गेले आठवड्याच्य तुलनेत घसरले आहेत. कोबी, वांगी, ढब्बू, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, वाल, प्लॉवरच्या दरात घसरण झाली आहे. गत आठवड्यात कोंथबीरचा दर शेकडा १६०० रुपये होता, त्यात घसरण होऊन ८०० रुपयांपर्यंत आली आहे. गवार, हिरवा टोमॅटोच्या दरात थोडी वाढ झालेली आहे. कणसांची आवक वाढली असून किरकोळ बाजारात दोन कणसांचा दर दहा रुपये आहे. पडवळ, मुळाची आवक वाढली आहे.