शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

स्टार ८८४... खिशात मोबाईल स्मार्ट; पण कोणाचाच नंबर नाही पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:29 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मोबाईल क्रांती झाल्याचा आपण डांगाेरा पिटत असलो तर त्याचे दुष्परिणामही गंभीर आहेत. ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मोबाईल क्रांती झाल्याचा आपण डांगाेरा पिटत असलो तर त्याचे दुष्परिणामही गंभीर आहेत. मोबाईलने माणसाची मेमरी घालविली असून आपला सोडून कुटुंबातील इतरांचा क्रमांकही आपणास लक्षात नसतो. स्वत:चे एकापेक्षा अधिक क्रमांक असले तरी तेही पाठ नसतात. जे मोबाईल वापरत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती तुलनेत अधिक चांगली असल्याचे दिसते.

काळानुरूप मोबाईलचा वापर करणे गरजेचे बनले असले तरी माणूस खूप त्याच्या आहारी गेला आहे. मूळ काम करताना आणि झाल्यानंतरही त्याने स्वत:ला मोबाईलमध्ये गुंतवून घेतल्याने त्याचा परिणाम माणसाच्या स्मरणशक्तीवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

असे का होते?

एखाद्या वस्तूचा वापर आपण कसा व किती वेळा करतो, त्यावर त्याचा टिकाऊपणा अवलंबून असतो. त्याप्रमाणे माणसाच्या मेंदूचेही आहे. ज्यांचे काम आयुष्यभर चाकोरेबद्ध राहिले आहे व नवीन काहीच करण्याचा प्रयत्न नसतो, अशा माणसांना विस्मृतीचा त्रास लवकर सुरू होतो. त्यात वय वाढेल तशी विस्मृतीचे प्रमाण वाढत जाते. आपले काम संपले की लगेच मोबाईलमध्ये डोके खुपसून बसतो. मोबाईलमध्येही आपल्या बुद्धीला चालना मिळेल असे नवीन काही करत नाही. जे आहे ते पाहत बसणे, एवढेच करत असतो.

हे टाळण्यासाठी काय करावे ?

मानवी मेंदू हा इतरांच्या तुलनेत वेगवान असतो. त्याला नेहमी नवनवीन काम दिले की तो त्याची गती कायम राहते. आपले नियमित कामाबरोबरच इतर छंद जोपासणे गरजेचे आहे. मोकळ्या वेळेतील जास्तीत जास्त काळ हा मेंदूला चालना देणारे काम केले तर, विस्मृतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

नातवापेक्षा अजोबाची स्मरणशक्ती अधिक

घरातील वयोवृद्ध मंडळी ७०-८० वर्षांच्या पूर्वीच्या आठवणी जशा आहेत तशा सांगतात. त्या उलट कुटुंबातील तरुणांची अवस्था आहे. रात्री झोपताना पैशाचे पाकीट कोठे ठेवले, हे दुसऱ्या दिवशी आठवत नाही.

पूर्वीच्या काळी आपल्या नियमित कामाशिवाय खूप वेळ मिळायचा, आता नवतंत्रज्ञानाच्या नावाखाली सगळेजण मोबाईलमध्ये अडकून पडल्याने कुटुंबातील संवाद कमी झाला आहे. तेच तेच चाकोरेबद्ध कामामुळे मेंदूची क्षमताही काहीसी कमी होते. यासाठी मेंदूला चालना देण्यासाठी नवनवीन काहीतरी करण्याच्या मागे लागले पाहिजे.

- डॉ. पवन खोत, मानसोपचारतज्ज्ञ

मी मोबाईल फार कमी वापरतो, सतत वेगळ्या कामात गुंतवून घेतल्याने वयाच्या ६६ व्या वर्षीही मला अनेक गोष्टींचे चटकन् स्मरण होते. कुटुंबातील प्रत्येकाने मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. अन्यथा आणखी काही वर्षांनी माणूस स्वत:लाच विसरून जाण्याची भीती आहे.

- नामदेव कांबळे, सोनाळी, ता. करवीर