शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

जागे व्हा, नाही तर अस्थी कलश मंत्रालयात ठेवू, शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:25 AM

बीडमधील नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. त्यांचा अस्थींचे पंचगंगा घाटावर विसर्जन करण्यात आले.

कोल्हापूर : अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर सरकार अजूनही जागे होणार नसेल तर अस्थिकलश थेट मंत्रालयात आणून ठेवू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. बीडमधील नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. त्यांचा अस्थिकलश काल, रविवारी दुपारी कोल्हापुरात आला. नर्सरी बागेत शाहू समाधीस्थळी अभिवादन करून कलशातील अस्थींचे पंचगंगा घाटावर विसर्जन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा संघटना, मराठा महासंघ, मल्हार सेना, जय शिवराय शेतकरी संघटनेने यात सहभाग घेतला.

राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. लाखो टन ऊस शेतात तसाच ठेवून कारखाने बंद झाले आहेत. या उसाचे करायचे काय, असा प्रश्नाने शेतकरी हतबल झाला आहे. तरीही सरकारला याकडे बघायला वेळ नाही. मशीद, भोंगे, मंदिर या प्रश्नात सरकार अडकून पडले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणीही पाहायला तयार नाही, या उद्विग्नतेतून नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर तर शेतकऱ्यांत संतापाची भावना आहे. त्यांचा अस्थिकलश राज्यभर फिरवला जात आहे. रविवारी हा कलश कोल्हापुरात आला.यावेळी शिवाजीराव माने, संपतराव पवार पाटील, बाबासो देवकर, बबन रानगे, वसंतराव मुळीक या कोल्हापुरातील नेत्यांबरोबरच यवतमाळचे सिकंदर शाह, परभणीचे माणिक कदम, कराडचे पंजाबराव पाटील, बी.जी. पाटील, विनायक पाटील यांनी पंचगंगा घाटावर जाऊन अस्थींचे विसर्जन केले. दरम्यान, सोमवारी कराडला प्रीतिसंगमावर अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी