शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूकदारांचा संप मागे

By admin | Updated: October 8, 2015 00:57 IST

व्यवहार पूर्ववत : पाच दिवसांत ५०० कोटींच्या उलाढालीवर परिणाम

कोल्हापूर : मालवाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले चक्का जाम बेमुदत आंदोलन मागे घेतल्यानंतर शहरात मंगळवारी मालवाहतूक सुरळीत झाली. गेले पाच दिवस मालवाहतूक बंद असल्याने याचा जिल्ह्यातील सुमारे ५०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम जाणवला. केंद्र शासनाने मालवाहतूकदारांच्या मागण्यांसाठी समिती नेमली असून, समितीने १५ डिसेंबरपर्यंत योग्य ते निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नवरात्र व दसरा-दिवाळी सणांवेळी जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम जाणवणार नाही.देशातील टोलनाके बंद करावेत, यासह विविध मागण्यांसाठी १ आॅक्टोबरपासून मालवाहतूकदारांचे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू होते. यामुळे गोकुळ शिरगाव, शिरोली, वाय. पी. पोवारनगर, कागल-हातकणंगले पंचतारांकित वसाहत, आदी औद्योगिक वसाहतींमधील आर्थिक उलाढालींवर परिणाम जाणवला. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे १६ हजार मालवाहतूकदार (आठ, दहा चाकी, आदी वाहने), टेम्पो १२ हजार, तर ९०० टँकर सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.मालवाहतूकदारांचे हे आंदोलन सोमवारी तात्पुरते स्थगित केले. त्यामुळे मंगळवारपासून शहरासह ग्रामीण भागात मालवाहतूक सुरळीत झाली. यामुळे नवरात्र, दसरा-दिवाळी या सणांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, यापूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री व मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात १९८९ ला १३ दिवस, त्यानंतर १९९३ ला सात दिवस व २०१२ ला चार दिवस अशाप्रकारचे बेमुदत आंदोलन मालवाहतूकदारांनी केले होते. (प्रतिनिधी)बस वाहतूकआॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला कोल्हापूर जिल्हा खासगी बस वाहतूक संघटनेने पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, सोमवारी रात्री केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांसंबंधी योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा खासगी बस वाहतूक संघटनेनेही आज, बुधवारी पुकारलेला बंद मागे घेतल्याचे बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले.