शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरबी’ची रक्कम निश्चित करा

By admin | Updated: November 19, 2015 01:19 IST

मुख्यमंत्र्यांची सूचना : पैसे कसे द्यायचे या प्रस्तावावर नंतर होणार निर्णय; मुंबईत बैठक

कोल्हापूर : कोल्हापूरची आयआरबी कंपनीच्या टोलमधून सुटका करायची असेल तर त्या कंपनीस रस्त्याच्या खर्चापोटी किती रक्कम द्यावी लागेल यासंबंधीची थेट चर्चा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कंपनीबरोबर सुरू करावी. ती रक्कम एकदा निश्चित झाल्यावर ते पैसे कसे द्यायचे यासंबंधीच्या प्रस्तावावर सरकार विचार करेल, असा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत झाला असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. यामुळे टोलच्या जोखडातून कोल्हापूरची सुटका होण्याचा मार्ग खुला झाल्याचे मानण्यात येत आहे. टोलच्या अंतिम मूल्यांकनासाठी आयआरबी कंपनी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी आणि फेरमूल्यांकन समितीचे सदस्य यांच्याबरोबर दोन दिवसांत बैठक घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोल्हापूरच्या टोलची रक्कम कशी भागवायची, त्याचे मूल्यांकन किती होईल, या विषयावर मुंबईत फडणवीस यांच्याबरोबर पालकमंत्री पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत ही प्राथमिक चर्चा झाली. कोल्हापुरात आयआरबी कंपनीने (बीओटी) या तत्त्वावर ४९.४९ किलोमीटरचे रस्ते तयार केले; पण ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप शहरवासीयांनी केला. याप्रश्नी राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम वगळून) एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली फेरमूल्यांकन समिती स्थापन केली. त्यामध्ये कोल्हापुरातील आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांना सदस्य म्हणून घेण्यात आले. या समितीतील सदस्यांनी आयआरबीने केलेल्या रस्त्यांचे मूल्यांकन १९२ कोटी रुपये असल्याचा अहवाल राज्य शासनाला दिला; पण हे मूल्यांकन सुमारे ४७३ कोटी रुपये होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील टोलला तीन महिन्यांपूर्वी तात्पुरती स्थगिती दिली. त्याची मुदत २६ नोव्हेंबर २०१५ रोजी संपत आहे. ‘आयआरबी’ कंपनीने ४७३ कोटींचा दावा केला असला तरी त्यांना किती रक्कम द्यायची हे त्यांच्याशी चर्चा करून चंद्रकांतदादा निश्चित करणार आहेत. ही रक्कम देताना त्यातील रोख किती व अन्य सवलतीच्या स्वरूपात काय द्यायचे, टेंबलाईवाडीतील भूखंडाची किंमत याचाही हिशेब त्यामध्ये केला जाणार आहे. ही रक्कम निश्चित झाल्यानंतर ते कसे भागवायचे यासंबंधीचे प्रस्ताव निश्चित केले जाणार आहेत. मंगळवारी (दि. १७) पालकमंत्री पाटील यांची फडणवीस यांच्याबरोबर बैठक होणार होती; परंतु काही कारणास्तव ही बैठक झाली नाही. बुधवारी नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांच्याशी फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर टोलप्रश्नी प्राथमिक चर्चा केली. ही चर्चा फडणवीस यांनी ऐकून घेतल्यानंतर रस्ते विकासक आयआरबी कंपनी व या विभागातील अधिकारी यांची अंतिम फेरमूल्यांकन किती होते यासाठी दोन दिवसांत बैठक घेऊ, असे पालकमंत्री पाटील यांना सांगितले. दोन दिवसांत होणाऱ्या या बैठकीत फेरमूल्यांकन समितीने व आयआरबीने सांगितलेली या दोन रकमांमधील तफावत तसेच आयआरबीचे पैसे कसे भागवायचे या विषयावर निर्णय होईल. (प्रतिनिधी)  

गेले दोन दिवस राज्य शासनाने कोल्हापूरच्या टोलप्रश्नी संबंधित विभागाबरोबर चर्चा केली आहे. ३० नोव्हेंबरपूर्वी टोल रद्दची अधिसूचना काढली जाईल, असे सांगितले आहे. या सरकारचे हे सकारात्मक पाऊल आहे. त्यामुळे कोल्हापूरचा टोल जाईल, असे यावरून दिसते. - निवास साळोखे, निमंत्रक, टोलविरोधी कृती समिती, कोल्हापूर.