शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यांतील १७४ गावांतील सरपंच निवडी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पन्हाळा, करवीर, शिरोळ व भुदरगडमधील १७४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पन्हाळा, करवीर, शिरोळ व भुदरगडमधील १७४ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडीच्या सभा स्थगित केल्या. या तालुक्यांमधील सरपंच निवडीबाबत मंगळवारी (दि. ९) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. उर्वरित आठ तालुक्यांतील २५९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीच्या सभा ठरल्याप्रमाणे ९ तारखेला पार पाडाव्यात व त्यांचा अहवाल १० तारखेला इतिवृत्तासह सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यानंतर २७ जानेवारीला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाली. हे आरक्षण रोटेशननुसार पडलेले नसल्याच्या कारणास्तव त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन शुक्रवारी न्यायालयाने करवीरमधील कोगे, खुपिरे, उंड्री (ता. पन्हाळा), शिरोळमधील शिरटी, मजरेवाडी आणि भुदरगडमधील फणसवाडी या सहा ग्रामपंचायतींची सरपंच निवडीची सभा स्थगित करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ तारखेपर्यंत सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी देसाई यांनी शनिवारी याबाबतचा आदेश काढला. यानुसार वरील चारीही तालुक्यांमधील सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीच्या ९ तारखेच्या सभा स्थगित केल्या आहेत व त्या १६ तारखेपर्यंत रोखून ठेवल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा ग्रामपंचायतींमधील हरकतींवर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होईल. त्यानंतर या चार तालुक्यांतील सरपंच निवडीचा कार्यक्रम नव्याने जाहीर होईल.

आठ तालुक्यांत मंगळवारी निवडी

आजरा, गडहिंग्लज, शाहूवाडी, कागल, हातकणंगले, राधानगरी, चंदगड, गगनबावडा या आठ तालुक्यांतील २५९ गावांतील सरपंच निवडीच्या सभा ठरल्याप्रमाणे ९ तारखेला होतील.

निवडी स्थगित झालेले तालुके : ग्रामपंचायतींची संख्या

करवीर : ५४

भुदरगड : ४५

पन्हाळा : ४२

शिरोळ : ३३

पुन्हा धाकधूक

या सहा गावांमुळे चारही तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये पून्हा अस्वस्थता आहे. रोटेशन पद्धतीमुळे एका गावातील सरपंच आरक्षण बदलले की त्याचा परिणाम अन्य गावांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदस्यांना याबाबत निर्णय होईपर्यंत पुन्हा देव पाण्यात घालून बसावे लागणार आहे.

---