शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘आता बस्स’ मोहिमेचे फलित : ‘लोकमत’संगे पडतंय विकासाचे पाऊल; यापुढेही राहणार पाठपुरावा कायम

By admin | Updated: July 28, 2014 00:03 IST

कोल्हापूरच्या रखडलेल्या प्रश्नांना गती

कोल्हापूरच्या रखडलेल्या प्रश्नांना गती‘आता बस्स’ मोहिमेचे फलित : ‘लोकमत’संगे पडतंय विकासाचे पाऊल; यापुढेही राहणार पाठपुरावा कायमकोल्हापूरच्या जिव्हाळ्याचे व विकासाशी निगडित अकरा महत्त्वाचे विषय ‘लोकमत’ने जानेवारीमध्ये ‘आता बस्स्...’ या विशेष वृत्तमालिकेद्वारे मांडले. सहा महिन्यांनंतर या प्रश्नांचा लेखाजोखा घेतला असता, त्यांतील तब्बल आठ प्रश्नांवर सोडवणुकीच्या दृष्टीने ठोस पावले पडली आहेत. तीन विषयांत मात्र कोणतीच हालचाल झालेली नाही. या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत ‘लोकमत’चा पाठपुरावा कायमपणे राहणार आहे.विश्वास पाटील - कोल्हापूरप्रश्न नागरी विकासाचे असोत, औद्योगिक अथवा पायाभूत सुविधांचे. कोल्हापूरला प्रत्येक प्रश्नासाठी संघर्ष करावा लागला, झगडावे लागले आहे. कोल्हापूरचा इतिहासही संघर्षाचाच आहे. माजी आरोग्यमंत्री कै. दिग्विजय खानविलकर यांनी कोल्हापूरसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले, तर आता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनासाठी प्रयत्न केले, ही अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास आजपर्यंत या शहराला व जिल्ह्यालाही राज्यात नेतृत्व देऊ शकेल व प्रश्न सोडवू शकेल, असे खमके नेतृत्व लाभले नाही. त्यामुळे कोल्हापूरने जो काही विकास केला, तो सगळा भांडून व वारंवार संघर्ष करूनच. हा संघर्ष आजही थांबलेला नाही व संपलेलाला नाही. टोलच्या प्रश्नावरून कोल्हापूरकर गेली चार वर्षे सातत्याने रस्त्यावर उतरून लढाई करीत आहेत. हे कोल्हापुरी माणसाच्या लढाऊपणाचे प्रतीकच. तेजस्वी वारसा असूनही कोल्हापूरचे काही मूलभूत प्रश्न जाग्यावरून हलायला तयार नव्हते, अशा प्रश्नांची रोखठोक सद्य:स्थिती मांडण्याचे काम ‘लोकमत’ने ‘आता बस्स्...’ या वृत्तमालिकेद्वारे केले. त्यामागील भूमिकाच ही होती की आता या प्रश्नांच्या सोडवणुकीचा अंत झाला आहे. प्रश्न नेमका काय, तो सोडविण्यातील अडचण काय आहे, तो न सुटल्याने कोल्हापूरचे काय नुकसान होत आहे व तो सोडविण्यासाठी काय करावे असा रोडमॅपच ‘लोकमत’ने मांडला होता.प्रश्न मांडतानाच अडचणींसह तो कसा सोडवला जाऊ शकतो, याचे दिशादर्शन या वृत्तमालिकेतून झाले. त्यास कोल्हापूरच्या जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतरही एखाद्या प्रश्नावर ‘आता बस्स...’ ही मालिका ‘लोकमत’ने सुरू करावी, असे वाचक सुचवू लागले, हेच यश म्हटले पाहिजे.जे अकरा विषय ‘लोकमत’ने मांडले, त्यांतील महालक्ष्मी मंदिराचा विकास, चित्रनगरी आणि उद्योगक्षेत्राच्या प्रश्नांबाबत फारशी प्रगती झालेली नाही. मात्र इतर आठ विषय मार्गी लागण्यासाठी ठोस उपाययोजना सुरू झाल्या आहेत. लोकमत’ उद्या (मंगळवार)पासून या प्रत्येक प्रश्नाची काय स्थिती आहे, त्यात आणखी काय व्हायला हवे याची मांडणी ‘आता बस्स..’ याच वृत्तमालिकेद्वारे करणार आहे. -दर सहा महिन्यांला हा लेखाजोखा ‘लोकमत’ प्रश्न सुटेपर्यंत मांडत राहील. ‘लोकमत’ या नावातच लोकांच्या मतांबद्दल आदर आहे. त्याच आदरापोटी हे प्रश्न आम्ही मांडत राहू.महालक्ष्मी मंदिरमंदिराचा विकास करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. दर्शन मंडप व अन्य कामांसाठी दहा कोटी रुपये राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी मंजूर केले. मात्र, मंत्रालयातच फाईल फिरत राहिली.चित्रनगरीचित्रनगरीची स्थिती भयाण अशीच आहे. त्याचा काही विकास करायचा आहे, हेच राज्य शासन विसरले आहे. नुसत्या घोषणा व आश्वासने यांचाच ‘ट्रेलर’ सुरू आहे. कार्यवाहीच्या पिक्चरची सध्या कोल्हापूरकरांना प्रतीक्षा आहे. उद्योगधंद्यांचे प्रश्नकोल्हापुरातील उद्योजकांनी वीज, कर व मूलभूत सोयींसाठी महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जाण्याची भूमिका घेतली. त्यानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उद्योजकांशी चर्चा केली; परंतु हा विषय तिथेच थांबला आहे. उद्योजक आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत.विमानतळकोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्नही बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. येत्या १५ आॅगस्टपासून सुप्रीम कंपनीची विमानसेवा सुरू होत आहे. तसेच केंद्राच्या ‘लो कॉस्ट’ विमानतळांमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाल्याने येथून विमानसेवेच्या ‘टेक आॅफ’चा मार्ग सुकर झाला आहे.हद्दवाढकोल्हापूर शहराची हद्दवाढ ऐरणीवर आली आहे. हद्दवाढ व्हायलाच हवी अशी ‘लोकमत’ची भूमिका आहे. परंतु हे करीत असताना ज्यांचा त्याबद्दल आक्षेप आहे, त्या ग्रामस्थांच्या भावनांनाही व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे.सीपीआर‘सीपीआर’ची प्रकृती सुधारावी यासाठी आग्रह धरणारी कृती समिती स्थापन झाली. तेथील कारभार सुधारला पाहिजे, असा दबावगट तयार झाला आहे. अन्य जिल्हा रुग्णालयांच्या तुलनेत ‘सीपीआर’ हे खूपच चांगल्या सेवा देणारे आहे, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. केशवराव नाट्यगृहकेशवराव भोसले नाट्यगृहासाठी व शाहू खासबाग मैदानासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून कामे सुरू झाली आहेत. मैदानाचा विकास झपाट्याने सुरू आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम नीट होईल, यावर लक्ष देण्याची जबाबदारी ‘लोकमत’ची असेल.रेल्वेचा प्रश्नरेल्वेचे प्रश्न नव्या सरकारकडून काही मार्गी लागतील अशी आशा होती. त्याची सुरुवात धिम्यागतीने का सुरू झाली आहे. अर्थसंकल्पात कोल्हापूरच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही. त्यामुळे त्यासाठीचा पाठपुरावाही तितकाच महत्त्वाचा आहे. रंकाळा विकासरंकाळ्याचा विकासाच्या बाबतीत दोन पावले पुढे व चार पावले मागे असे होत आहे. निधी आहे परंतु त्याच्या कामाला जेवढी गती हवी ती मिळालेली नाही. परंतु रंकाळा तंदुरुस्त राहिला पाहिजे, ही कोल्हापूरची लोकभावना आहे. तोच या प्रश्नातील मोठा दबावगट आहे. पंचगंगा प्रदूषणपंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनेही काही प्रमाणात निश्चितच काम झाले आहे. महापालिकेने ७६ कोटी रुपये खर्चून ७५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. त्यातील २६ एमएलडी सांडपाण्यावर पहिल्या टप्प्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. कोंडलेली वाहतूककोल्हापूर शहरातील वाहतुकीचा बट्ट्याबोळ ‘लोकमत’ने सातत्याने मांडला. त्याची दखल घेऊन वाहतूक शाखेने सतरा ठिकाणी सिग्नल बसविले. आता चौका-चौकांत वाहतूक पोलीस दिसतो. काही प्रमाणात वाहतुकीला शिस्त लागली आहे.