शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वेळ पडल्यास प्रादेशिक आराखडा रद्द करणार

By admin | Updated: March 28, 2017 00:27 IST

चंद्रकांतदादा पाटील : ६००० हरकती, लोकांमध्ये भीती

कोल्हापूर : जिल्ह्याच्या प्रादेशिक आराखड्यावर ६००० हरकती आल्या असून लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. वेळ पडल्यास हा आराखडाच रद्द करून पुन्हा नव्याने कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी तीन वर्षांत मेहनत घेऊन प्रादेशिक आराखडा तयार केल्याचे सांगितले. यावर एकवेळ मेहनत वाया गेली तरी चालेल, पण लोकांची वाट लागता कामा नये, असे पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने आराखडा तयार केला असून एका रस्त्यावर येणाऱ्या १५ विहिरी गायब केल्या आहेत, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर जिल्हाधिकारी सैनी यांनी हा आराखडा ३१ मार्चपूर्वी शासनाला मंजुरीसाठी पाठवायचा असल्याने त्यावर पालकमंत्र्यांची स्वाक्षरी महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यामुळे हा आराखडा मंजुरीसाठी जाऊ दे नाही तर पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हटल्यावर तीन वर्षे जातील. आराखडा मंजूर झाल्यावर त्यावर चौकशी लावून ती वर्षभरात पूर्ण करून त्रुटी दूर करता येऊ शकतात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.पालकमंत्री पाटील म्हणाले, आराखडा मंजुरीसाठी पाठविल्यानंतर तो मंजूर झाल्यावरही त्यावर चौकशी लावता येते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सांगून आपण यावर चौकशी लावू. हा आराखडा लोकांच्या हितासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे चौकशी समिती नेमून लोकांच्या शंकांचे समाधान होईपर्यंत हा आराखडा मंजूर करू देणार नाही. वेळ पडल्यास हा आराखडा रद्द करून पुन्हा नव्याने सुरुवात केली जाईल; परंतु लोकांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. (प्रतिनिधी)तोपर्यंत अधिकारीच सरकार चालविणारलोकप्रतिनिधींकडून एखाद्या विषयात लक्ष घालून बारकाईने अभ्यास करून ते हुशार होत नाहीत तोपर्यंत अधिकारी व प्रशासनच सरकार चालवतील, असे सांगून हे चित्र बदलण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्र्यांनी मांडले.