शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

वेळ पडल्यास प्रादेशिक आराखडा रद्द करणार

By admin | Updated: March 28, 2017 00:27 IST

चंद्रकांतदादा पाटील : ६००० हरकती, लोकांमध्ये भीती

कोल्हापूर : जिल्ह्याच्या प्रादेशिक आराखड्यावर ६००० हरकती आल्या असून लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. वेळ पडल्यास हा आराखडाच रद्द करून पुन्हा नव्याने कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी तीन वर्षांत मेहनत घेऊन प्रादेशिक आराखडा तयार केल्याचे सांगितले. यावर एकवेळ मेहनत वाया गेली तरी चालेल, पण लोकांची वाट लागता कामा नये, असे पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने आराखडा तयार केला असून एका रस्त्यावर येणाऱ्या १५ विहिरी गायब केल्या आहेत, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर जिल्हाधिकारी सैनी यांनी हा आराखडा ३१ मार्चपूर्वी शासनाला मंजुरीसाठी पाठवायचा असल्याने त्यावर पालकमंत्र्यांची स्वाक्षरी महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यामुळे हा आराखडा मंजुरीसाठी जाऊ दे नाही तर पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हटल्यावर तीन वर्षे जातील. आराखडा मंजूर झाल्यावर त्यावर चौकशी लावून ती वर्षभरात पूर्ण करून त्रुटी दूर करता येऊ शकतात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.पालकमंत्री पाटील म्हणाले, आराखडा मंजुरीसाठी पाठविल्यानंतर तो मंजूर झाल्यावरही त्यावर चौकशी लावता येते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सांगून आपण यावर चौकशी लावू. हा आराखडा लोकांच्या हितासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे चौकशी समिती नेमून लोकांच्या शंकांचे समाधान होईपर्यंत हा आराखडा मंजूर करू देणार नाही. वेळ पडल्यास हा आराखडा रद्द करून पुन्हा नव्याने सुरुवात केली जाईल; परंतु लोकांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. (प्रतिनिधी)तोपर्यंत अधिकारीच सरकार चालविणारलोकप्रतिनिधींकडून एखाद्या विषयात लक्ष घालून बारकाईने अभ्यास करून ते हुशार होत नाहीत तोपर्यंत अधिकारी व प्रशासनच सरकार चालवतील, असे सांगून हे चित्र बदलण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्र्यांनी मांडले.