शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘कुंभी’च्या राजकारणात राजर्षी शाहू आघाडी अभेद्य राहणार?

By admin | Updated: June 12, 2015 00:31 IST

साखर कारखान्याचे राजकारण : यशवंत मंच, बचाव मंचची सवतासुभ्याची तयारी

मच्छिंद्र मगदूम - सांगरूळ -कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे विरोधी गटाची महत्त्वाची भूमिका बजावणारी राजर्षी शाहू आघाडी यावेळी अभेद्य राहणार ? यशवंत मंच व कुंभी बचाव मंच सवतासुभा मांडण्याचा हालचाली गतिमान झाल्याने निवडणूक दुरंगी की तिरंगी याविषयी ‘कुंभी’ परिसरात उत्सुकता लागली आहे. -कुंभी कासारीचा निवडणुकीचा आखाडा आतापर्यंत तुल्यबळ लढतीमुळे गाजला आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डी. सी. नरके यांनी पाच वर्षांचा अपवाद वगळता कारखान्याच्या स्थापनेपासून कारखान्यावर पकड कायम ठेवली. स्वर्गीय श्रीपतराव बोदं्रे, मारुतराव खाडे, पा. वि. पाटील, नी. आर. देसाई या दिग्गज नेत्यांना त्यांनी टक्कर दिली. डी. सी. नरके यांच्यानंतर त्यांचे विरोधक अधिक आक्रमक झाले. त्यात आमदार चंद्रदीप नरके ‘कुंभी’ च्या राजकरणात नवनवे असल्याने त्याचा फायदा उठवत राजर्षी शाहू आघाडी सत्तांतर घडविले; पण सभासदांना दिलेले आश्वासन त्यांना पाळता आले नसल्याने त्यानंतर सलग दोन निवडणुका आमदार नरके यांनी एकतर्फी जिकल्या. प्रत्येक निवडणुकीत नरके यांना शाहू आघाडीचा माध्यमातून विरोधकांनी कडवे आव्हान दिले; पण गेल्१ँ दीड वर्षांपासून ‘गोकुळ’ चे संचालक बाळासाहेब खाडे यांचे बंधू बाजीराव खाडे यांनी ‘कुंभी’ बचाव मंचची स्थापना करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुंभी च्या कारभारावर विविध मार्गाने टीकेचा झोड उठवून त्यांनी परिसरात वातावरण चांगले तयार केले. आंदोलनापुरती त्यांची भूमिका ठीक होती. ‘बचाव मंच’ चे काम करत असताना त्यांनी कुभीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. मंच अंतर्गत सभासदाची नोंदणी करून त्यांनी स्वत:च्या नेतृत्वाखाली निवडणूक कार्य केले आहे. सभासदांना विश्वासात घेतले नसल्याचा तक्रारी आहेत. यशवंत बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश देसाई यांनीही यशवंत मंचच्या माध्यमातून जुन्या जानकार लोकांना बरोबर घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी उमेदवारांची चाचपणी करत सावध हालचाली सरू केल्या आहेत. खाडे हे तरुण व नवनवे आहेत. पण, त्यांच्या नेतृत्वाखाली शाहू आघाडीचे ज्येष्ठ नेते काम करतील का? हा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत. दोन्ही मंचची तयारी पाहिली, तर तिरंगी लढतीचे चित्र दिसते. तिरंगी लढत झाली, तर निवडणुकीचे काय चित्र असेल, हे समजण्यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार नाही. हे मात्र निश्चित आहे.चंद्रदीप नरकेंची सावध भूमिकाविरोधकांमध्ये दोन मतप्रवाह झाल्याने ‘कुंभी’ ची निवडणूक आमदार नरके यांच्यासाठी तशी अवघड दिसत नाही. विरोधक एकसंघ असताना त्यांनी एकहाती सत्ता हस्तगत केल्या आहेत, तरीही त्यांनी सावध भूमिका घेतली आहेत. मनोमिलनासाठी ‘पी. एन’ यांची कसोटी अ‍ॅड़ प्रकाश देसाई व बाजीराव खाडे हे दोेघेही पी. एन. पाटील यांचे नेतृत्व मानतात. त्यामुळे दोघांनी आता कितीही सवतासुभ्याची तयारी केली असली, तरी शेवटच्याक्षणी पाटील एकत्रित मोट बांधतील त्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार, हे नक्की आहे.