शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

पाऊस झाला कमी, पंचगंगेची पाणीपातळी ओसरु लागली; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:13 IST

जिल्ह्यातील ९३ मार्गांवर पाणी : वाहतूक ठप्प

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडझाप दिल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी ओसरु लागली आहे. आज, केर्लीनजीक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग शिवाजी पूल येथे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, केर्ले ते केर्ली दरम्यानचा रस्ता पाण्याखाली असल्यामुळे हा मार्ग बंद आहे. यामार्गावरील वाहतूक शिवाजी पूल - केर्ली - जोतिबा रोड - वाघबिळ - रत्नागिरी या मार्गाने सुरु आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी जिल्ह्यातील राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण, असे ९३ मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या, तरी काही काळ ऊनही पडले होते. पाऊस कमी झाल्याने पुराचे पाणी कमी होईल, अशी अपेक्षा होती; पण धरणातून विसर्ग सुरूच राहिल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत हळूहळू घट होत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले त्यातून प्रतिसेंकद २९२८ घनफूट विसर्ग सुरू आहे. वारणातून १५३६९ तर दूधगंगेतून १८६०० घनफूट विसर्ग सुरू आहे. पाण्याची पातळी स्थिरावली असली, तरी नदीकाठच्या गावांतील नागरिक, जनावरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील तीन प्राथमिक, तर एक माध्यमिक शाळा बंद राहिली.

जिल्ह्यात असे झाले स्थलांतर..तालुका -  कुटुंबे - व्यक्ती - जनावरे

  • राधानगरी  - ४७ - २०२ -  १२८
  • करवीर - ४० - ४६ - ०
  • भुदरगड - ०६ - २२ - ०५
  • कागल - ०२ - ११ - ०

असे आहेत मार्ग बंद

  • राज्य - १०
  • प्रमुख जिल्हा मार्ग - ३९
  • इतर जिल्हा मार्ग - १४
  • ग्रामीण मार्ग - ३०

धरणातील विसर्गधरण - विसर्ग (घनफूट) 

  • राधानगरी - ४,३५६
  • वारणा - १५,३६९ 
  • दूधगंगा - १८,६००
  • कासारी - १,५०० 
  • घटप्रभा - ४,२७७ 
  • धामणी - ७,१७५ 

एस. टी. च्या ३४ फेऱ्या बंदपुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एस. टी. च्या वाहतुकीला ब्रेक लागला आहे. दिवसभरात एस. टी. च्या ३४ फेऱ्या रद्द झाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

पडझडीत ४८ लाखांचे नुकसानजिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १४२ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये ४८ लाख १५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.