शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस झाला कमी, पंचगंगेची पाणीपातळी ओसरु लागली; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:13 IST

जिल्ह्यातील ९३ मार्गांवर पाणी : वाहतूक ठप्प

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडझाप दिल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी ओसरु लागली आहे. आज, केर्लीनजीक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग शिवाजी पूल येथे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, केर्ले ते केर्ली दरम्यानचा रस्ता पाण्याखाली असल्यामुळे हा मार्ग बंद आहे. यामार्गावरील वाहतूक शिवाजी पूल - केर्ली - जोतिबा रोड - वाघबिळ - रत्नागिरी या मार्गाने सुरु आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी जिल्ह्यातील राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण, असे ९३ मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्या, तरी काही काळ ऊनही पडले होते. पाऊस कमी झाल्याने पुराचे पाणी कमी होईल, अशी अपेक्षा होती; पण धरणातून विसर्ग सुरूच राहिल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत हळूहळू घट होत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले त्यातून प्रतिसेंकद २९२८ घनफूट विसर्ग सुरू आहे. वारणातून १५३६९ तर दूधगंगेतून १८६०० घनफूट विसर्ग सुरू आहे. पाण्याची पातळी स्थिरावली असली, तरी नदीकाठच्या गावांतील नागरिक, जनावरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील तीन प्राथमिक, तर एक माध्यमिक शाळा बंद राहिली.

जिल्ह्यात असे झाले स्थलांतर..तालुका -  कुटुंबे - व्यक्ती - जनावरे

  • राधानगरी  - ४७ - २०२ -  १२८
  • करवीर - ४० - ४६ - ०
  • भुदरगड - ०६ - २२ - ०५
  • कागल - ०२ - ११ - ०

असे आहेत मार्ग बंद

  • राज्य - १०
  • प्रमुख जिल्हा मार्ग - ३९
  • इतर जिल्हा मार्ग - १४
  • ग्रामीण मार्ग - ३०

धरणातील विसर्गधरण - विसर्ग (घनफूट) 

  • राधानगरी - ४,३५६
  • वारणा - १५,३६९ 
  • दूधगंगा - १८,६००
  • कासारी - १,५०० 
  • घटप्रभा - ४,२७७ 
  • धामणी - ७,१७५ 

एस. टी. च्या ३४ फेऱ्या बंदपुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एस. टी. च्या वाहतुकीला ब्रेक लागला आहे. दिवसभरात एस. टी. च्या ३४ फेऱ्या रद्द झाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

पडझडीत ४८ लाखांचे नुकसानजिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १४२ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये ४८ लाख १५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.