शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

पुनवेचा चांद- भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

अवघडलेल्या स्थितीत रमाला रिक्षात घालून तिचा नवरा शांताराम हाॅस्पिटलच्या दिशेनं निघाला. खेड्यातून हाॅस्पिटलला पोहोचायला किती वेळ लागणार, याचा त्याला ...

अवघडलेल्या स्थितीत रमाला रिक्षात घालून तिचा नवरा शांताराम हाॅस्पिटलच्या दिशेनं निघाला. खेड्यातून हाॅस्पिटलला पोहोचायला किती वेळ लागणार, याचा त्याला अंदाज येत नव्हता. आडवळणी रस्ते, पुराचं पाणी, लाईट नाही, रमा वेदनेनं विव्हळतेय अशा कठीण परिस्थितीत मदतीला कोणीच नव्हतं. संध्याकाळ उलटून गेली होती. रस्त्यावर तुरळक माणसं गुडघाभर पाण्यातून वाट शोधत कुठंतरी निघालेली. बायांच्या कडेवर तान्ही पोरं. चार चाैघांनी म्हाताऱ्याला झोळीतून उलचून घेतलेलं. गावात पुराच्या पाण्यानं थैमान घातलेलं. घराघरांत गुडघाभर पाणी. संसार सारा पाण्यात. अशा अडचणीत शांताराम धायकुतीला आला होता. पुराच्या पाण्यात त्यानं रिक्षा घातली खरी लाटांच्या माऱ्यानं रिक्षाला वेग येईना. रमा ओरडत होती.

काय म्हणावं या पावसाला. पाऊस का वैरी... कुठं जायचं... कसं जायचं.. देवा दया कर रे बाबा.. तिला सुखरूप दवाखान्यात पोहोचू दे. नवीन जन्माला येणारं बाळ सुखरूप असू दे. देवा दया कर... शांताराम मनोमन देवाला आळवत होता.

एवढ्यात रमाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पाण्यातून चालणाऱ्या येसू मावशी चटकन रिक्षात बसल्या. ‘‘बाय.. देव परीक्षा घेतुया.. घाबरू नगो... व्हईल सारं नीट.. धीर धर .. दमानं घे... मी हाय तुझ्यासंगट .. ’’

येसूमावशी सुतारपाड्यावर राहणाऱ्या. एकटीच विधवा बाई. कुणाच्याही अडीनडीला धावून जाणारी. ती निघाली होती पुढच्या वळणावर आपल्या बहिणीकडं. देवानंच तिला पाठवली जणू आता. शांतारामला थोडा धीर आला. म्हणाला,

‘‘मावशे, बेस झालं बग. तू देवावानी भेटलीस. अगं हिच्या कळा बघून मला काय सुदरना. त्यातून हा पाऊस. मावश्ये रमाची सुटका व्हईल ना गं.’’

तू गुमान रिक्षा चालव. म्या बघते हिच्याकडं. रमाच्या अंगावरनं हात फिरवत येसूमावशी म्हणाली. जिवाच्या आकांतानं तो रिक्षा चालवत होता. दवाखाना हाकेच्या अंतरावर आला आणि जोरात किंचाळत रमानं रिक्षातच बाळाला जन्म दिला. येसूमावशीनं जवळच्या पिशवीतून जुनेरं बाहेर काढलं. बाळंतीणीला मोकळं केलं. अडकित्त्यानं नाळ कापून जुनेराच्या फडक्यात बाळ स्वच्छ करून दुसऱ्या कापडात त्याला गुंडाळलं. बाळंतीणीला थोडं दुष्टन काढलं. रिक्षा दवाखान्याच्या दारात गेली. तिथल्या नर्सने बाळ-बाळंतीणीला स्वच्छ करून योग्य औषधोपचार केले. येसू मावशी होती म्हणून सारं निभावलं. ती नसती तर शांताराम एकटा काय करू शकणार होता.

मावशे तुला भनीकडं जायचं असल न्हवं.. चल सोडून येतो.. भन तुझी वाट बघत असंल.. शांताराम म्हणाला.

‘‘शांतारामा, माज्या भनीकडं जान्यापरुस रमाकडं ध्यान देणं जरुरीचं हाय.. सकाळ होऊ दे .. पोरीला काय हवं, नगो बघते, मग म्या भनीकडं जाते....’ येसूमावशीच्या बोलण्यानं शांतारामचं मन भरून आलं. देव हाय आपल्याला दिसत न्हाई... पण हाय ...’’

मध्यान रात रमा गुंगीतच होती. नवजात पोरगी शांत झोपली होती. आपण कुठल्या परिस्थितीत जन्म घेतलाय त्या कोवळ्या जिवाला कुठं माहीत होतं... सरकारी दवाखान्याच्या आतल्या बाकड्यावर बसून शांतारामनं रात्र काढली. कधीतरी त्याचा डोळा लागला होता. मावशी त्याला हाक मारत होती. ‘‘शांताराम.. अरं उठ... सूर्य वर यायला लागलाय न्हवं... पाऊस बी थांबलाय.. रमा अन् तुझी लेक सुखरूप हायती. भाईर टपरीवरनं चहा घेऊन ये... मावशी म्हणाली’’

शांतारामनं दवाखान्याच्या बाथरूममध्ये तोंड धुतलं. चूळ भरली आणि तो चहा आणायला टपरीवर गेला. चहावाला गरम भजी तळत होता. शांतारामनं दोन भजी प्लेट घेतली आणि दोन चहा. मावशी संगट चहाभजी खाल्ल्यावर दोघांनाही थोडा हुरूप आला.

नर्स म्हणाली, दादा, बाळंतीणीला गाडीवरून गरम दूध-साखर घालून आणून द्या. बिस्कीटं मिळाली तर आणा. शांताराम पुन्हा बाहेर गेला. चहावाल्याकडं बरणीत बिस्कीटपुडे होते. शांतारामने दहा-दहा रुपयांचे मारी बास्किटाचे दोन पुडे आणि गरम दूध घेतलं.

रमा आता सावरली होती. लेकीला छातीशी धरून पाजण्याचा प्रयत्न करत होती. शांतारामनं अतिशय प्रेमळ नजरेनं आपल्या बायकोकडं पाहिलं. समाधानानं दोघं हसली. बिस्कीट-दूध घेतल्यावर रमाला हुशारी वाटली. मावशी नर्सबरोबर काही बोलत होती. शांताराम म्हणाला, ‘मावशे तुझं लई म्हणजे लईच उपकार झालंत बघ.. माझ्या बायकोला आणि बाळाला वाचवलंस. तुझं उपकार कसं फेडायचं आम्ही...!

अरं शांताराम ... याला माणुसकी म्हणत्यात. उपकार न्हवत. म्या नसते तर दुसरं कोणी तुझ्या मदतीला आलं असतं. जड वाटून घिऊ नकोस.. माणसानं माणसाला मदत करायला पायजेल न्हवं ... उपकार कशाचं रं बाबा.. तुझ्या लेकीच्या जन्माला माझा हातभार ही देवाचीच किरपा म्हणायची... चल, आता मला भनीकडं घेऊन. तीन दिस रमा आणि बाळ दवाखान्यात राहणार. आपण घरला जाऊ. गरजेच्या वस्तू घेऊन पुन्हा माघारी येऊ. तोवर नर्सबाई रमा आणि लेकीची काळजी घेत्याल... मावशीनं साधं सोपं तत्त्वज्ञान सांगितलं.

रमेचा निरोप घेऊन दोघं निघाली. पाऊस पूर्ण थांबला होता. रात्रीतून रस्त्यावरचं पाणी ओसरलं होतं. अर्ध्या तासात रिक्षा येसूमावशीच्या भनीच्या दारात. ती वाटच बघत होती. मावशीनं भनीला घडला प्रकार सांगितला. दोघींनी जेवण तयार केलं. डबा भरून घेतला. दोन जुन्या साड्या, बेडशीट, तांब्या-भांडं, ग्लास, चमचा, ताटली अशा गरजेच्या वस्तू घेऊन तासाभरात रिक्षा पुन्हा दवाखान्याच्या दारात आली. मावशीनं जुनी साडी फाडून धजेती तयार केली. नर्सनं अंघोळ घालून बाळाला दवाखान्याच्या दुपट्यात गुंडाळून ठेवलं होतं. झबलं, टोपडं घातलं होतं. पावडर लावली होती. रमाची लेक तरतरीत दिसत होती. रमाला मऊ गुरगुट्या भात, मेतकूट, इवलंस तूप घालून मावशीनं दिला. रमाच्या डोळ्यात पाणी तरळलं. मावशी निटपऱ्या रागानं म्हणाली... आता डोळ्यात पाणी कशापायी, समदं झ्याक झालंय. गुमानं भात खाऊन घे. लेकीला अंगावरचं दूध पायजे. डोळं पूस .. तुझं पयलंच लेकरू. चार दिस कसबी जात्याल. काळजी करून नगो ... मावशीच्या दटावण्यानं रमानं डोळे पुसले.