शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अहंकार चढलेल्यांना खाली खेचा

By admin | Updated: October 9, 2014 00:18 IST

स्मृती इराणी : राज्यात महिला असुरक्षित असल्याचीही टीका

कोल्हापूर : प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवास भोगला. महाराष्ट्राच्या जनतेने कॉँग्रेस-राष्ट्रवादी राजवटीत पंधरा वर्षे वनवास भोगला. म्हणूनच अहंकाराची परिसीमा गाठलेल्या या राजवटीला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज, बुधवारी येथे केले. ज्या राज्यात महिला पोलीस सुरक्षित राहू शकल्या नाहीत, तेथे सर्वसामान्य महिला तरी कशा सुरक्षित राहू शकतील? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक व कोल्हापूर उत्तरचे उमेदवार महेश जाधव यांच्या प्रचारार्थ संभाजीनगरातील पटांगणावर आयोजित केलेल्या सभेत स्मृती इराणी बोलत होत्या. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर कॉँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता मिळविली, त्या शेतकऱ्यांवर त्यांनी लाठीहल्ले केले, गोळीबार केला. राज्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; पण त्यांना कोणतीही मदत केली नाही. उलट पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी अपमानित केले. अशा अहंकार चढलेल्यांना घरात बसवायची वेळ आली आहे, असे इराणी म्हणाल्या. इराणी यांनी कोल्हापूर शहराला पर्यटनाचा दर्जा का दिला नाही, राज्यातील जनतेला चोवीस तास वीज का दिली नाही, गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा का प्रयत्न केला नाही, असे सवाल उपस्थित केले. अरुंधती महाडिक म्हणाल्या, महाडिक निवडणुकीस उभारतात काहींना पक्षनिष्ठा आठवते; परंतु पक्षात असूनही तुम्ही विरोध करता त्यावेळी तुमची पक्षनिष्ठा कोठे जाते? धनंजय महाडिक निवडून गेल्यानंतर त्यांनी चांगली कामे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, परंतु चांगल्या कामांसाठी राज्य सरकारची एनओसी देण्यात आमचे मंत्री आडवे पडले, असा आरोपही त्यांनी केला.यावेळी आमदार संजय पाटील, महेश जाधव, अमल महाडिक, राजेंद्र ठाकूर, शैलजा पाटील यांची भाषणे झाली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, राजलक्ष्मी खानविलकर, रामभाऊ चव्हाण, आदी उपस्थित होते. तुमचे कसलेच श्रेय नाहीधनंजय महाडिक यांना खासदारपदी निवडून आणण्यात मंत्र्यांचे श्रेय आहे असा दावा केला जातो; पण असा दावा कोणी करू नये. महाडिक स्वत:च्या ताकदीवर व कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेच्या जिवावर निवडून आले आहेत, असा दावाही अरुंधती महाडिक यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर महाडिकांवर गुंडगिरीची टीका केली जाते, पण ती खोटी आहे. आम्ही घरंदाज असून, घरात तसेच समाजातही स्त्रियांचा सन्मान करण्याची महाडिक कुटुंबीयांची परंपरा असल्याचे त्या म्हणाल्या.