शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

महापुरात पाठ फिरविणाऱ्या सरकारला खाली खेचा : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:47 IST

कोल्हापूर : सरकारच्या बेफिकीरपणामुळेच महापूर आला; पण संकटकाळात मदत करण्याऐवजी त्यांनी जनतेला वाºयावर सोडले. जमिनीवर न उतरता हेलिकॉप्टरमधून हवाई ...

कोल्हापूर : सरकारच्या बेफिकीरपणामुळेच महापूर आला; पण संकटकाळात मदत करण्याऐवजी त्यांनी जनतेला वाºयावर सोडले. जमिनीवर न उतरता हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी केली, बोटीतून पिकनिकला आल्यासारखे सेल्फी काढून पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले, अशा असंवेदनशील आणि मस्तवाल सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी कोल्हापुरात केले. महाजनादेश यात्रा घेऊन कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री महापूरकाळात कुठे होते, असा सवालही त्यांनी केला.वंचित आघाडीच्या नागपूरपासून सुरू झालेल्या सत्तासंपादन यात्रेचा समारोप बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात दसरा चौकात झाला. निर्धार सभेत भर पावसात भिजतच आघाडीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ फुटला. स्वबळावर जागा निवडून आणण्यासाठी २८८ किलोंचा हार अर्पण केला गेला.आंबेडकर म्हणाले, संकटकाळात मदतीची सरकारची जबाबदारी होती; पण तीदेखील त्यांनी नीट पार पाडली नाही. पूरग्रस्तांना आपुलकी दाखवली नाही. धरणातील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन केले नाही.व्यासपीठावर अण्णाराव पाटील, नवनाथ पडळकर, अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे, प्रा.यशपाल ंिभंगे, अरुणा माळी, इंद्रजित कांबळे, जीवन पाटील, यशवंत भिगे, अनिल म्हमाने, अस्लम सय्यद आदी मान्यवर नेते उपस्थित होते. अनिल म्हमाने यांनी स्वागत केलेजीवन पाटील वंचितमध्येराष्ट्रवादीचे आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सदस्य जीवन पाटील यांनी वंचित आघाडीत प्रवेश केला. पावसातच कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसूनच पाटील यांचे जल्लोषात सभास्थळी आगमन झाले. त्यांचे निळा फेटा बांधून स्वागत करण्यात आले.सध्याचे भाजपचे सरकार आजवरचे सर्वांत मोठे चोर आहे. विरोधी पक्ष लंगडा झाला आहे, स्वत:च्या पायावर उभे राहायचे म्हटले तर त्यांना तुरुंगाची भीती दाखविली जात आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा सगळा मामला सुरू आहे. सरकारच्या सर्वच कामांत भ्रष्टाचार वाढला आहे. बेरोजगारी वाढली, कामगारांच्या हातांना काम राहिले नाही, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हे सरकार शेतकरी गोरगरिबांचे नसून दलाल आणि भांडवलदारांचे आहे, असाघणाघाती आरोप आंबेडकर यांनी केला.