शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न २ महिन्यात मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST

जिल्हाधिकारी राहुल रेखावार : बेमुदत आंदाेलन आज स्थगित होण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांना ...

जिल्हाधिकारी राहुल रेखावार : बेमुदत आंदाेलन आज स्थगित होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप, वसाहतीतील नागरी सुविधा, प्लॉटचे वाटप असे प्रलंबित प्रश्न पुढील दोन महिन्यात मार्गी लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पसंती दिलेल्या जमिनींचे तातडीने वाटप यासह विविध विषयांसाठी त्यांनी कालबद्ध नियोजन करून देत, गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आज, शुक्रवारी प्रशासनाकडून लेखी पत्र मिळाल्यानंतर हा निर्णय होणार आहे.

वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मार्च महिन्यापासून श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. जमिनींचे वाटप सुरू झाले आहे, काही आदेश झाले आहेत. पण पूर्ण पुनर्वसन केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा प्रकल्पग्रस्तांचा निर्धार होता. अखेर यावर गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बैठक घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, वन विभागाचे आर. आर. काळे, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडीचे तहसीलदार, पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाकडे प्रलंबित असलेल्या विषयांवर त्या त्या अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम आखून दिला. जमिनी-प्लॉटचे वाटप, वसाहतीतील प्रश्न, रस्ते, नागरी सुविधा, गावठाण, शोध घेतलेल्या सरकारी जमिनींची पसंती, लपून राहिलेल्या जमिनींची प्रक्रिया या कार्यवाहीचे नियोजन व वेळ ठरवून दिली. दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊन किती प्रश्न मार्गी लागले, कोणते प्रश्न प्रलंबित आहेत याचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

---

सुनावणी घेऊन वाटप

ज्या जमिनींबाबत प्रकल्पग्रस्तांनी पसंती अर्ज दिले आहेत, त्या जमिनींचे वाटप करण्यासाठी २२ व २८ तारखेला सुनावणी घेऊन वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या विविध अडचणींवरदेखील चर्चा करून मार्ग काढण्यात येणार आहे.

---

फोटो कोलडेस्कला श्रमिक फोटो नावाने मेल केला आहे.

ओळ :

वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती जिल्हा प्रशासनाच्यावतीने गुरुवारी करण्यात आली. यावेळी डॉ. भारत पाटणकर, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे उपस्थित होत्या.

----