शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

‘पी. एम. किसान’च्या बोगस ८१०० खातेदारांवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:29 IST

राजाराम लोंढे, लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १६७०० बोगस खातेदारांपैकी अद्याप ...

राजाराम लोंढे, लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १६७०० बोगस खातेदारांपैकी अद्याप ८१०० खातेदार हे योजनेचा लाभ घेत आहेत. शासनाने मुदत देऊनही त्यांनी लाभाची रक्कम परत न केल्याने संबंधितांवर थेट कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने खातेदार शेतकऱ्यांसाठी ‘पी. एम. किसान’ योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून महिन्याला पाचशे असे चार महिन्यांचे दोन हजार रुपये वर्षातून तीन हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. मात्र यामध्ये आयकर परतावा करणारे, शासकीय कर्मचारी, शिक्षक, आदींनी लाभ घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. कोल्हापूर जिल्ह्यात १६७०० खातेदार हे बोगस असल्याचे चौकशीत उघड झाले होते. संबंधितांना नोटिसा काढून लाभ घेतलेली रक्कम जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने बँकेचा खाते क्रमांक सुरू करून त्यामध्ये लाभ घेतलेली रक्कम भरण्याबाबत सूचना केली होती. मात्र ८६०० बोगस लाभार्थ्यांनी पैसे परत केले व लाभ घेण्याचे बंद केले. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी लावून वर्ष होत आले आहे.

हा घोटाळा संपूर्ण देशात झाला असून त्याची व्याप्ती खूपच मोठी आहे. याबाबत लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बोगस लाभ घेणाऱ्यांवर कारवाईचे आदेश राज्यांना दिले होते. राज्य शासनाने वसुलीची कारवाई तातडीने करण्याचे आदेश जिल्हा पातळीवर दिले असून तिची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंडल कृषी अधिकारी व तलाठ्यांची बैठक घेऊन संबंधितांना वसुलीच्या सूचना दिल्या आहेत. जे पैसे भरणार नाहीत, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

बॅकांच्या पातळीवर कारवाईची चाचपणी

पी. एम. किसान योजनेची बहुतांशी खाती ही जिल्हा बँकेत आहेत. त्यामुळे बँकेच्या पातळीवर संबधित खात्यांची पडताळणी करून पेन्शनचे पैसे थांबवले जाऊ शकतात का, याविषयी चाचपणी करण्यात आली. मात्र शासनाने मंजूर करून दिलेल्या पेन्शनचे पैसे न देण्याचा अधिकार बँकांना नसल्याने हा पर्याय मागे पडला.

तलाठी, ग्रामसेवकांना जबाबदार धरणार

बोगस खातेदारांकडून वसुलीची जबाबदारी तलाठी, मंडल कृषी अधिकारी व ग्रामसेवकांवर सोपवली आहे. जे पैसे भरणार नाहीत, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश तिघांना दिले आहेत. यामध्ये हयगय केल्यास तिघांना जबाबदार धरले जाणार आहे.