शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘मनपा’ला अनुदान नव्हे, कर्जच देणार

By admin | Updated: April 13, 2015 00:37 IST

टोलप्रश्न : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

कोल्हापूर : मूल्यांकन समितीचा अहवाल थोड्याच दिवसांत प्राप्त होणार असून, त्यानुसार ‘आयआरबी’ कंपनीला किती रक्कम द्यायची हे निश्चित होईल. त्यानंतर कंपनीला दिलेला भूखंड शिवाय उर्वरित द्यावे लागणारे पैसे महापालिकेला कर्जरूपाने देण्याच्या विचाराधीन आहे; पण ३१ मे नंतर कोल्हापूर टोलमुक्त करू, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील टोलमुक्तीचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. लहान वाहनांना वगळण्यात आले म्हणून त्याचा बोजा अवजड वाहनांवर बसणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. कोणताही प्रकल्प बांधताना ४० टक्के केंद्र व राज्य सरकार पैसे देते. ६० टक्के बिल्डरचा हिस्सा असतो. त्यामुळे अवजड वाहनांना याचा भुर्दंड बसणार नाही. कोल्हापूरच्या टोलबाबत आयआरबी कंपनीशी चर्चा सुरू असून, अनेक बैठका झाल्या आहेत. त्यांची ६०० कोटींची मागणी आहे; पण रस्ते मूल्यांकन समितीच्या प्राथमिक अंदाजानुसार ३२५ कोटींपेक्षा जास्त रक्कम कंपनीला देऊ नये, असे मत आहे. यातून काहीतरी मार्ग निघेल. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीला ३१ मे पूर्वी अंतिम अहवाल देण्यास सांगितल्याने हा विषय लवकरच संपुष्टात येईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ोन हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज दिले आहे. खरेदी कर माफ केला, मळी नियंत्रण मुक्त केली, सहवीज प्रकल्पाचे प्रलंबित बिले देण्याचाही निर्णय झाल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील, महेश जाधव, रामभाऊ चव्हाण, बाबा देसाई उपस्थित होते.हाळवणकर यांची मुक्ताफळे राज्याप्रमाणे कोल्हापुरातही अवजड वाहनांवर टोल आकारण्यास कोणतीच हरकत नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. म्हणजे कोल्हापूर टोलमुक्त करायचे नाही, अशा हालचाली सुरू आहेत का? अशी विचारणा पत्रकारांनी केली असता, मंत्री पाटील यांनी सारवासारव करीत हा आॅफ द रेकॉर्ड प्रश्न असल्याचे सांगितले. मग देखभाल दुरुस्तीचे बघूकोल्हापूरचा टोल घालविणार, पण रस्त्यांची देखभाल दुरुस्ती महापालिकेला झेपणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, पहिला टोल घालवू नंतर देखभाल दुरुस्तीचे काय करायचे ठरवू.प्रकल्पाचा करार जरी २२० कोटी असला तरी तीन वर्षांत टोल वसुली होऊ न शकल्याने व्याजासह ४४० कोटी रुपये होऊ शकतील. कंपनीला व्याज द्यावेच लागेल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. राष्ट्रीय मार्गाबाबत आठ दिवसांत निर्णय राष्ट्रीय महामार्गावरील टोलबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे. येत्या आठ-दहा दिवसांत याबाबतही सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.