शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ऊसदर आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेल करू नये --धैर्यशील माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:15 AM

आंदोलन केले तरच उसाला दर मिळतो, ही काहींनी खुळी समजूत करून ठेवली आहे. ह्यएफआरपीह्णचा कायदाच असल्याने येथून पुढे आंदोलन करायची वेळच येणार नाही. आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेलिंग करू नये. कायद्याप्रमाणे सर्वांना एफआरपी द्यावीच

ठळक मुद्देशेट्टींना वायफळ आत्मविश्वास नडलाजातिपातीचे राजकारण झाले असते तर मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला जनतेने खासदार केले नसते.शेतकरी संघटनेशी शत्रुत्व नाही

कोल्हापूर : आंदोलन केले तरच उसाला दर मिळतो, ही काहींनी खुळी समजूत करून ठेवली आहे. ह्यएफआरपीह्णचा कायदाच असल्याने येथून पुढे आंदोलन करायची वेळच येणार नाही. आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेलिंग करू नये. कायद्याप्रमाणे सर्वांना एफआरपी द्यावीच लागणार आहे. कोण जर थकवत असेल तर त्यांना थकविण्याचे काम येथून पुढे केले जाईल. या संदर्भात शासनदरबारी कठोर भूमिका घ्यावी लागली तर घेणार; पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारच, असा विश्वास हातकणंगलेचे नवनियुक्त खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांबरोबरच इचलकरंजीतील टेक्साईल, डोंगरवाड्या-वस्त्यांवरील तरुणांना रोजगार, शेतीमाल प्रक्रिया केंद्र आणि आष्ट्यात एमआयडीसीसह पंचगंगा नदी शुद्ध करणे ही कामे सध्या मी अजेंड्यावर घेतली असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी टीमवर्कने काम करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांना पराभूत करून पहिल्यांदाच खासदार झालेले धैर्यशील माने यांनी शुक्रवारी ह्यलोकमतह्णशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळण्यापासून ते विजयी होईपर्यंतच्या वाटचालीवर भाष्य करताना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या चुकांवरही अचूकपणे बोट ठेवले. देशपातळीवरील नेतृत्वाचे वेध लागलेल्या शेट्टींना मतदारसंघातील प्रश्न मात्र दिसले नाहीत. केवळ उसाचे आंदोलन केले की मतदारसंघाचा विकास होत नसतो. त्यासाठी अष्टपैलू नेतृत्व हवे.

शेतीबरोबरच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नागरी प्रश्न आहेत. याकडे त्यांनी कधी पाहिलेच नाही. ते स्थानिक पातळीवरील वास्तवापासून ते लांबच राहिले. हाताला रोजगार देण्याची गरज असताना त्यांनी आंदोलने करायला लावली. मोदींनी माझ्याविरोधात रिंगणात उतरवून दाखवावे, असे आव्हान ते देत राहिले. त्यांना हाच वायफळ आत्मविश्वास नडला. कै. खासदार बाळासाहेब माने यांना मानणारा गट आणि शिवसेना भाजपच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर सकारात्मक विचारधारा घेऊन मी निवडणूक लढविली आणि जिंकली आहे. आता मतदारसंघात तरुणाईच्या नव्या विकासपर्वाला प्रारंभ होत आहे.उद्धव ठाकरे रत्नपारखीबाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे शब्द पाळणारे एकमेव नेते आहेत. पक्षप्रवेशावेळी उमेदवारीचा दिलेला शब्द त्यांनी तंतोतंत पाळला. माझ्यातील स्पार्क ओळखण्याचे काम त्यांनी केले. ते खऱ्याअर्थाने रत्नपारखी आहेत. मी त्यांना दिल्लीत भगवा नेण्याचा शब्द दिला होता, तो शब्द मीही पाळला आहे. आता मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार आहे. याउलट ज्या पवारांच्या पक्षात माने गटाने २० वर्षे घालवली, त्या पवारांना माझ्यातील स्पार्क दिसला नाही, याचे वाईट वाटते. मी घराणेशाही म्हणून उमेदवारी मागत नव्हतो. माझ्यात ती क्षमता होती; पण पवारांना ते दिसले नाही, त्यांना आपल्या नातवामध्ये असा कुठला स्पार्क दिसला, हे माहीत नाही.शेतकरी संघटनेशी शत्रुत्व नाहीशेतकरी संघटना काही माझी शत्रू नाही, ती स्पर्धक होती. आता स्पर्धा संपली आहे. आता येथून पुढे सर्वजण एकत्रितपणे मतदारसंघातील प्रश्न सोडवू. मी शेती असणारे आणि नसणारे अशा दोन्हींचा प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा वारसा सांगणाºया कोल्हापूर जिल्ह्याचा सर्व गट-तट, राजकारण विसरून एकदिलाने विकास करू.पंचगंगा प्रदूषणाचा विषय प्राधान्याने हाती घेणारमाझ्या मतदारसंघातील शिरोली, नृसिंहवाडी या गावांपर्यंत पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. या संदर्भात मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असल्यापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. तीन महिन्यांपूर्वी पंचगंगेची परिक्रमाही पूर्ण केली आहे. हा मतदारसंघातील जनतेच्या जगण्यामरण्याचा प्रश्न असल्याने त्याला प्राधान्याने हात घालणार आहे. केंद्र आणि राज्य या दोन्हींच्या पातळीवर हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे, प्रदूषणाचा अहवाल केंद्रापर्यंत गेला आहे. याचा पाठपुरावा करून पूर्ण पंचगंगा शुद्ध करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.वारणा योजना प्रश्न सामंजस्याने सोडवणारइचलकरंजीला पिण्याचे पाणी देण्यासाठी वारणा योजना तातडीने करणे गरजेचे आहे. हा प्रश्न ग्रामीण आणि शहरी जनतेतील गैरसमजामुळे क्लिष्ट झाला आहे. या दोन्ही घटकांमध्ये सामंजस्य घडविण्यावर माझा भर राहणार आहे.मराठा आरक्षणावर संसदेत आवाज उठवणारमराठा आरक्षणावर मी कायमच भूमिका घेतली आहे. केंद्र व राज्य सरकारकडे मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे; येथून पुढे त्याच्या सवलती मिळाव्यात यासाठी संसदेत आवाज उठविणार आहे. धनगर आरक्षणाच्याबाबतीतही माझी हीच भूमिका राहणार आहे.------------------------------------------जातिपातीचे राजकारण झाले असते तर मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला जनतेने खासदार केले नसते. जातिधर्माचे राजकारण केले असे ते म्हणत असतील तर तो आतापर्यंत त्यांना मतदान केलेल्यांचा अपमान आहे. मी बहुजन म्हणूनच रिंगणात उतरलो, मी कधीही जातीचा उल्लेख केला नाही. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीElectionनिवडणूक