शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदर आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेल करू नये --धैर्यशील माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 10:19 IST

आंदोलन केले तरच उसाला दर मिळतो, ही काहींनी खुळी समजूत करून ठेवली आहे. ह्यएफआरपीह्णचा कायदाच असल्याने येथून पुढे आंदोलन करायची वेळच येणार नाही. आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेलिंग करू नये. कायद्याप्रमाणे सर्वांना एफआरपी द्यावीच

ठळक मुद्देशेट्टींना वायफळ आत्मविश्वास नडलाजातिपातीचे राजकारण झाले असते तर मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला जनतेने खासदार केले नसते.शेतकरी संघटनेशी शत्रुत्व नाही

कोल्हापूर : आंदोलन केले तरच उसाला दर मिळतो, ही काहींनी खुळी समजूत करून ठेवली आहे. ह्यएफआरपीह्णचा कायदाच असल्याने येथून पुढे आंदोलन करायची वेळच येणार नाही. आंदोलनावरून कुणी ब्लॅकमेलिंग करू नये. कायद्याप्रमाणे सर्वांना एफआरपी द्यावीच लागणार आहे. कोण जर थकवत असेल तर त्यांना थकविण्याचे काम येथून पुढे केले जाईल. या संदर्भात शासनदरबारी कठोर भूमिका घ्यावी लागली तर घेणार; पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारच, असा विश्वास हातकणंगलेचे नवनियुक्त खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांबरोबरच इचलकरंजीतील टेक्साईल, डोंगरवाड्या-वस्त्यांवरील तरुणांना रोजगार, शेतीमाल प्रक्रिया केंद्र आणि आष्ट्यात एमआयडीसीसह पंचगंगा नदी शुद्ध करणे ही कामे सध्या मी अजेंड्यावर घेतली असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी टीमवर्कने काम करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांना पराभूत करून पहिल्यांदाच खासदार झालेले धैर्यशील माने यांनी शुक्रवारी ह्यलोकमतह्णशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळण्यापासून ते विजयी होईपर्यंतच्या वाटचालीवर भाष्य करताना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या चुकांवरही अचूकपणे बोट ठेवले. देशपातळीवरील नेतृत्वाचे वेध लागलेल्या शेट्टींना मतदारसंघातील प्रश्न मात्र दिसले नाहीत. केवळ उसाचे आंदोलन केले की मतदारसंघाचा विकास होत नसतो. त्यासाठी अष्टपैलू नेतृत्व हवे.

शेतीबरोबरच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नागरी प्रश्न आहेत. याकडे त्यांनी कधी पाहिलेच नाही. ते स्थानिक पातळीवरील वास्तवापासून ते लांबच राहिले. हाताला रोजगार देण्याची गरज असताना त्यांनी आंदोलने करायला लावली. मोदींनी माझ्याविरोधात रिंगणात उतरवून दाखवावे, असे आव्हान ते देत राहिले. त्यांना हाच वायफळ आत्मविश्वास नडला. कै. खासदार बाळासाहेब माने यांना मानणारा गट आणि शिवसेना भाजपच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर सकारात्मक विचारधारा घेऊन मी निवडणूक लढविली आणि जिंकली आहे. आता मतदारसंघात तरुणाईच्या नव्या विकासपर्वाला प्रारंभ होत आहे.उद्धव ठाकरे रत्नपारखीबाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे शब्द पाळणारे एकमेव नेते आहेत. पक्षप्रवेशावेळी उमेदवारीचा दिलेला शब्द त्यांनी तंतोतंत पाळला. माझ्यातील स्पार्क ओळखण्याचे काम त्यांनी केले. ते खऱ्याअर्थाने रत्नपारखी आहेत. मी त्यांना दिल्लीत भगवा नेण्याचा शब्द दिला होता, तो शब्द मीही पाळला आहे. आता मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार आहे. याउलट ज्या पवारांच्या पक्षात माने गटाने २० वर्षे घालवली, त्या पवारांना माझ्यातील स्पार्क दिसला नाही, याचे वाईट वाटते. मी घराणेशाही म्हणून उमेदवारी मागत नव्हतो. माझ्यात ती क्षमता होती; पण पवारांना ते दिसले नाही, त्यांना आपल्या नातवामध्ये असा कुठला स्पार्क दिसला, हे माहीत नाही.शेतकरी संघटनेशी शत्रुत्व नाहीशेतकरी संघटना काही माझी शत्रू नाही, ती स्पर्धक होती. आता स्पर्धा संपली आहे. आता येथून पुढे सर्वजण एकत्रितपणे मतदारसंघातील प्रश्न सोडवू. मी शेती असणारे आणि नसणारे अशा दोन्हींचा प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा वारसा सांगणाºया कोल्हापूर जिल्ह्याचा सर्व गट-तट, राजकारण विसरून एकदिलाने विकास करू.पंचगंगा प्रदूषणाचा विषय प्राधान्याने हाती घेणारमाझ्या मतदारसंघातील शिरोली, नृसिंहवाडी या गावांपर्यंत पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. या संदर्भात मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असल्यापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. तीन महिन्यांपूर्वी पंचगंगेची परिक्रमाही पूर्ण केली आहे. हा मतदारसंघातील जनतेच्या जगण्यामरण्याचा प्रश्न असल्याने त्याला प्राधान्याने हात घालणार आहे. केंद्र आणि राज्य या दोन्हींच्या पातळीवर हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे, प्रदूषणाचा अहवाल केंद्रापर्यंत गेला आहे. याचा पाठपुरावा करून पूर्ण पंचगंगा शुद्ध करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.वारणा योजना प्रश्न सामंजस्याने सोडवणारइचलकरंजीला पिण्याचे पाणी देण्यासाठी वारणा योजना तातडीने करणे गरजेचे आहे. हा प्रश्न ग्रामीण आणि शहरी जनतेतील गैरसमजामुळे क्लिष्ट झाला आहे. या दोन्ही घटकांमध्ये सामंजस्य घडविण्यावर माझा भर राहणार आहे.मराठा आरक्षणावर संसदेत आवाज उठवणारमराठा आरक्षणावर मी कायमच भूमिका घेतली आहे. केंद्र व राज्य सरकारकडे मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे; येथून पुढे त्याच्या सवलती मिळाव्यात यासाठी संसदेत आवाज उठविणार आहे. धनगर आरक्षणाच्याबाबतीतही माझी हीच भूमिका राहणार आहे.------------------------------------------जातिपातीचे राजकारण झाले असते तर मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला जनतेने खासदार केले नसते. जातिधर्माचे राजकारण केले असे ते म्हणत असतील तर तो आतापर्यंत त्यांना मतदान केलेल्यांचा अपमान आहे. मी बहुजन म्हणूनच रिंगणात उतरलो, मी कधीही जातीचा उल्लेख केला नाही. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीElectionनिवडणूक