शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

नव्या इथेनॉल धोरणांमुळे साखर उद्योगाचे भले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 12:23 IST

इथेनॉलच्या उत्पादनामुळे साखर उत्पादन कमी होईल व देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचा साठा कमी होऊन साखरेचे दर स्थिर होण्यास व वाढण्यासही मदत होऊ शकेल.

विश्वास पाटील

कोल्हापूर : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना ऑक्टोबर २०२२पासून दहा टक्के इथेनॉल मिश्रण न केल्यास लीटरला दोन रुपये जादा अबकारी कर लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा महाराष्ट्रासह देशातील साखर उद्योगाला चांगला फायदा होऊ शकतो. इथेनॉलच्या उत्पादनामुळे साखर उत्पादन कमी होईल व देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचा साठा कमी होऊन साखरेचे दर स्थिर होण्यास व वाढण्यासही मदत होऊ शकेल.

भारतातील इथेनॉल वापराचे पथदर्शी धोरण निश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने नीती आयोगाचे अतिरिक्त सचिव डॉ. राकेश सरवाल यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने जून २०२१मध्ये केंद्र शासनाला अहवाल दिला आहे. त्यानुसार २०२५पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट आहे. एप्रिल २०२२पर्यंत १० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट असताना सध्या सरासरी ८.५ टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण केले जात आहे. केंद्र सरकारच्या मालकीच्या तीन तेल कंपन्यांचा या धोरणाला प्रतिसाद आहे.परंतु, काही खासगी तेल उत्पादक कंपन्या इथेनॉल धोरणास तयार नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही इथेनॉल न मिसळता पेट्रोल विकणार असाल तर तुम्हाला लीटरला दोन रुपये जादा मोजावे लागतील, असे केंद्र शासनाने बजावले आहे. त्याची अंमलबजावणी ऑक्टोबर २०२२पासून केली जाणार आहे. पेट्रोल महागले तर लोक ते घेणार नाहीत, असा त्यामागील होरा आहे.

दहा टक्के इथेनॉल मिश्रण केल्यास देशाला ४६५ कोटी लीटर इथेनॉल वर्षाला लागू शकते. सध्या ३८५ कोटी लीटर इथेनॉल निर्मितीचा कोटा केंद्र शासनाने निश्चित करून दिला आहे. ३१ डिसेंबर २०२१पर्यंत एवढे उत्पादन व्हायला हवे, असे प्रयत्न होते. येत्या दोन-तीन महिन्यात पुरेशा प्रमाणात इथेनॉल निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याने दहा टक्के मिश्रण सुरु झाले तरी इथेनॉलची अडचण भासणार नाही.

दहा टक्के इथेनॉलचा वापर सुरु होईल, तेव्हा किमान ३४ लाख टन साखर त्यासाठी लागू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याचा अर्थ तेवढी साखर देशांतर्गत साठ्यातून कमी होईल. ‘इस्मा’ने यंदाच्यावर्षी किमान ३१४ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. देशांतर्गत बाजारातील इथेनॉल व निर्यात अशा दोन्हीमुळे जेवढी साखर कमी होईल, तेवढा साखरेला चांगला दर मिळू शकतो व त्याचा फायदा पर्यायाने साखर कारखानदारी व शेतकऱ्यांनाच होतो.पथदर्शी धोरण काय सांगते...

१० टक्के इथेनॉल मिश्रण : एप्रिल २०२२

२० टक्के इथेनॉल मिश्रण : एप्रिल २०२३ ते २०२५

२० टक्के इथेनॉल मिश्रणावर चालणारे इंजिन निर्मिती - एप्रिल २०२५

भारताची साखरेची वार्षिक गरज २७० लाख टन असताना यंदा ३१४ लाख टन उत्पादन व ८२ लाख टनाचा मागील वर्षाचा साठा आहे. देशांतर्गत बाजारातील साखर कमी केल्यासच चांगला दर मिळू शकतो. त्यासाठी इथेनॉलबाबत घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरु शकतो. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने