शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्था टिकणे गरजेचे : सिरपूरकर

By admin | Updated: November 30, 2014 23:57 IST

तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला

कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या न्यायव्यवस्थेत फार आमूलाग्र बदल झाले आहेत. आजच्या काळात प्रत्येकजण हुकूमशाही पद्धतीने वागला आणि ज्या दिवशी असा प्रकार घडेल तो दिवस काळा असेल, असे मत आज, रविवारी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व नागपूर येथील विकास सिरपूरकर यांनी व्यक्त करून न्यायव्यवस्था टिकणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.ते ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम आणि अमृतमहोत्सवी श्री महालक्ष्मी को-आॅप बँक यांच्या संयुक्त विद्यमाने तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ते ‘न्यायव्यवस्था-कथा आणि व्यथा’ या विषयावर बोलत होते. मंगळवार पेठेतील प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर हे व्याख्यान झाले.विकास सिरपूरकर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात न्यायव्यवस्थेत बदल होते. ही व्यवस्था अधिकारावर चालायची. कोलकात्यामधील नंदकुमार घोष या संस्थानिकाला फसवणूकप्रकरणी फाशीची शिक्षा देणारे हे इंग्रज त्या काळात होते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे, आपण घटना किशी लिहिली त्यापेक्षा ती घटना चालवणारे कसे आहेत, याचा विचार प्रथम व्हायला पाहिजे तरच आपण त्याची अंमलबजावणी करू शकलो, असे म्हणेन. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे तसेच समाजातील शोषित घटकांना न्याय मिळालाच पाहिजे, असे न्यायाधीशांचे मत असते. सध्या ज्यांच्याकडे पैसे आहेत, अशांनाच न्याय मिळत आहे, यावर त्यांनी खंत व्यक्त केली. घटस्फोट असो अथवा कुळ-मालक वाद असो, त्यामध्ये न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पक्षकारांना न्याय लवकर द्यावा, हीच अपेक्षा न्यायाधीशांची असते. न्यायव्यवस्था कोसळेल त्या दिवशी जंगलराज व ठोकशाहीचे राज्य येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.