शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळीचा प्रश्न राष्ट्रवादी विधिमंडळात मांडणार

By admin | Updated: July 10, 2017 04:04 IST

नेवाळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा प्रश्न कायद्याच्या कचाट्यात आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा प्रश्न कायद्याच्या कचाट्यात आहे. त्यावर तोडग्यासाठी राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आणि जमीन परत करण्याच्या मागणीवर राष्ट्रवादी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवेल, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडल्यानंतर तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेवाळी पाडा, भाल आणि वसार या गावांना भेट दिली. पीडित शेतकऱ्यांसह महिलांची भेट घेतली. तेव्हा पवार यांच्यापेक्षा तटकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सारिका गायकवाड, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, गावातील संघर्ष समितीचे नेते गुलाब वझे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीने उपचार उरकल्याची भावनानेवाळी पाडा, वसार, भाल गावात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली. खोणी गावात नेते जाणार होते. पण पवार यांची गाडी पुढे निघून गेल्याने ही भेट रद्द झाली. पवार यांनी शेतकऱ्यांशी संवादही न साधल्याने या भेटीचा फक्त उपचार उरकला गेला. काहीही साध्य झाले नसल्याची भावना नेवाळी आंदोलन पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे आंदोलन २२ जूनला झाले आणि दुसऱ्याच दिवशी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील आले, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना २० दिवसांनी आंदोलनकर्त्यांची आठवण झाली. स्थानिक नेत्यांनीही या काळत दुर्लक्ष केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पाठ फिरवल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली. ‘आमच्या माणसांना बाहेर काढा’नेवाळी आंदोलनात अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे. कर्ते पुरुष लॉकअपमध्ये आहेत. त्यांना मारहाण होते. फक्त महिला व मुलांना शेतीची कामे करता येत नाही. मुले शाळेत जात नाहीत. नेवाळी नाक्यावर भाजी घेण्यासाठीही कोणी गेले, तर त्याला पोलिस उचलून नेतात. पोलिसांची दहशत आहे. यावर काही तोडगा काढा, अशी मागणी गावातील महिलांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडे केली. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची दोनदा भेट घेऊनही उपयोग झाला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. >आंदोलकांतही दुजाभावनेवाळी आंदोलनप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात तीन व मानपाडा पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. ६७ जणांविरोधात कलमे सारखीच लावली होती. मानपाडा पोलीस ठाण्यातील २५ जणांना न्यायालयाने जामीन दिला. मात्र हिललाईन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांप्रकरणी अद्याप जामीन न मिळाल्याने आंदोलकांत दुजाभाव केल्याची कूरबूर नेवाळी परिसरातील ग्रामस्थांनी केली.