नागपूर-रत्नागिरी महामार्ग मे अखेर पूर्ण होणे कठीण, कधी झाली कामाला सुरुवात, किती टक्के काम पुर्ण झाले..वाचा सविस्तर

By भीमगोंड देसाई | Updated: January 30, 2026 12:37 IST2026-01-30T12:36:23+5:302026-01-30T12:37:53+5:30

आंबा घाटात सुरक्षित जाळी

Nagpur-Ratnagiri highway unlikely to be completed by May end More extensions may be available | नागपूर-रत्नागिरी महामार्ग मे अखेर पूर्ण होणे कठीण, कधी झाली कामाला सुरुवात, किती टक्के काम पुर्ण झाले..वाचा सविस्तर

नागपूर-रत्नागिरी महामार्ग मे अखेर पूर्ण होणे कठीण, कधी झाली कामाला सुरुवात, किती टक्के काम पुर्ण झाले..वाचा सविस्तर

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : कोकण आणि विदर्भाला जोडणाऱ्या नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गातील आंबा ते चोकाकपर्यंतचे काम पूर्ण करण्याची मुदत मे २०२६ अखेरपर्यंत मुदत आहे. याचे आतापर्यंत काम ६३ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम या मुदतीत पूर्ण करणे आव्हानात्मक आहे. ठेकेदार कंपनीस मे अखेरपर्यंत मुदत असली तरी तीन महिने आणखी मुदतवाढ मिळू शकते, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नागपूर ते सांगलीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. सांगली ते कोल्हापूरपर्यंतचा रस्ता रखडला आहे. चोकाक परिसरातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामाला गती येणार आहे. चोकाक ते आंब्यापर्यंतचे काम गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी मिऱ्याबंदर ते आंबापर्यंतचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील काम किरकोळ राहिले आहे. सध्या आंबा घाटातील काम युद्धपातळीवर केले जात आहे.

पाऊस अधिक असल्याने पावसाळ्यात दरड कोसळत असते म्हणून आंबा घाटात दोन्ही बाजूला सुरक्षिततेसाठी जाळी लावली जात आहे. आंबा ते चोकाकपर्यंतच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. त्यावर मात करून कामे केले जात आहे. या टप्प्यातील मोठे डोंगर फोडून उड्डाणपूल बांधले जात आहेत. तीव्र वळणे काढली जात आहेत. यामुळे कामास विलंब होत आहे, असे प्रशासन म्हणणे आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली

पन्हाळा तालुक्यातील आवळी आणि हातकणंगले तालुक्यातील शिरोली-बसवनखिंड येथे टोलनाके होणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही टोल नाक्यावरून टोल वसुली होणार आहे.

सन २०२३ पासून काम सुरू...

आंबा ते पैजारवाडी ४५ किलोमीटर तर पैजारवाडी ते चोकाक ३२ किलोमीटरचा रस्ता सन २०२३ पासून होत आहे. पावसाळ्यात प्रचंड पाऊस असल्याने काम गतीने करता येत नाही. मध्यंतरी भूसंपादनाच्याही अडचणी आल्या होत्या. परिणामी काम वेळेत पूर्ण झालेले नाही. तब्बल ४५ मीटर रुंद हा रस्ता होत आहे. यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर ते नागपूरपर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे.

Web Title : नागपुर-रत्नागिरी राजमार्ग मई अंत तक पूरा होना मुश्किल: विवरण अंदर

Web Summary : नागपुर-रत्नागिरी राजमार्ग के पूरा होने में देरी; केवल 63% काम हुआ। भूमि अधिग्रहण, भारी बारिश और कठिन इलाके जैसी चुनौतियाँ हैं। लक्ष्य मई 2026 है, लेकिन विस्तार संभव है। 45 मीटर चौड़ी सड़क के लिए टोल बूथ योजनाबद्ध हैं।

Web Title : Nagpur-Ratnagiri Highway Completion Unlikely by May End: Details Inside

Web Summary : Nagpur-Ratnagiri highway's completion faces delays; only 63% done. Challenges include land acquisition, heavy rains, and difficult terrain. Target is May 2026, but extension possible. Toll booths planned post-completion for this 45-meter wide road.