शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन समाजाचा झुंजार कार्यकर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पुरोगामी चळवळीत सक्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते अशीच दादासाहेब जगताप यांची ओळख आहे. बहुजन समाज ...

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पुरोगामी चळवळीत सक्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते अशीच दादासाहेब जगताप यांची ओळख आहे. बहुजन समाज जातीपातीच्या उतरंडीमधून बाहेर पडून त्याने फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा जोपासली पाहिजे, यासाठी ते आयुष्यभर प्रयत्न करत राहिले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून ते अनेक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात व्हायला हवे, यासाठी धडपड करणारी ती व्यक्ती आहे. त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुण्यतिथीदिवशी २ जानेवारी १९६९ला ‘बहुजन समाज’ साप्ताहिकाचे प्रकाशन केले व या साप्ताहिकाचे सतत १९ वर्षे संस्थापक संपादक म्हणून काम केले. या साप्ताहिकात भाई माधवराव बागल; तत्कालीन मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पी. बी. सावंत, बापूसाहेब घोरपडे, वीर उत्तमराव मोहिते, प्रा. मा. म. देशमुख व भाई केशवराव घोंगडे यांनी लेखन केले. या साप्ताहिकात ‘गोडसे : हुतात्मा की भुुतात्मा’ ही ३२ लेखांची लेखमालिका पी. बी. पोवार यांनी प्रसिद्ध केली. त्यावेळी महाराष्ट्रात फार मोठी खळबळ उडाली होती.

बहुजन समाजाला जागे करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांच्या (२७ नोव्हेंबर १९७०) पुण्यतिथीला ‘फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच’ची स्थापना केली. संघटनेच्या अध्यक्षपदी जगताप यांची निवड झाली व ज्येष्ठ पत्रकार शांताराम बोकील यांची उपाध्यक्ष, चिटणीस म्हणून माजी महापौर भिकशेठ पाटील यांची निवड झाली होती.. या विचार मंच संघटनेतर्फे बहुजन समाज विचार जागरण सुरू झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जगताप यांना दोन महिने शिक्षा झाली. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या गव्हर्निंग कौन्सिल कार्यकारिणीवर त्यांची संचालक म्हणून निवड झाली. त्यावेळी प्रिन्स शिवाजी बोर्डिंग संस्थेत न्यू कॉलेजची स्थापना करावी म्हणून जगताप यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शंकरराव नलवडे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ स्थापन करावे म्हणून जगताप व भाई शामराव माळी यांनी सायकलवरून फिरून प्रमुख नागरिकांच्या सह्या घेतल्या. नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सभा बोलावून ठराव पास केला आणि शिक्षणतज्ज्ञ सी. रा. तावडे, आमदार पी. बी. साळोखे, ‘पुढारी’चे संपादक ग. गो. जाधव, नगराध्यक्ष बी. बी. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारला निवेदन दिले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. मुंबई शहरातील क्रॉफर्ड मार्केटला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्यातही त्यांचा वाटा होता. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकासमोरील पुतळा व्हावा, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.

महापालिका व्हावी यासाठी...

सीमाभाग महाराष्ट्राला मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊन चळवळ केली. कोल्हापूर शहरात नगरपालिका होती. कोल्हापूर शहर मोठे शहर असताना महानगरपालिका नाही, यासाठी जगताप व भाई दिनकरराव पाटील यांनी महानगरपालिका करावी म्हणून त्यावेळचे नगराध्यक्ष वसंतराव निगडे यांच्यामार्फत प्रयत्न केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसचे काम निष्ठेने केले. ही पक्षीय बांधिलकी त्यांनी आजही जपली आहे.

फोटो : २९०४२०२१-कोल-दादासाहेब जगताप-वाढदिवस