शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा

By admin | Updated: September 6, 2015 23:36 IST

हरी नरके : रंगराव मांडरे यांचा द्वितीय स्मृतिदिन; मराठी 'संस्कृत'ची मावशी

कोल्हापूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. याबाबत लवकरच घोषणा होणार आहे. जगातील विद्वानांनी मराठीचे महत्त्व मान्य केले असून केंद्र सरकारनेही त्याला मान्यता दिली आहे. मराठी ही ‘संस्कृत’ची मावशी आणि ‘पाली’ची सख्खी बहीण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी शुक्रवारी केले. राजेंद्रनगर येथील क्रांतिज्योती महात्मा फुले हायस्कूलतर्फे रंगराव मांडरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शाहू स्मारक भवनातील कार्यक्रमात ते बोलत होते. अभिजात मराठी हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी मधुकर शिर्के होते. प्रा. नरके म्हणाले, मराठी भाषा ही संस्कृतमधून निर्माण झाली आहे, हा गैरसमज आहे. संस्कृत भाषेपूर्वी भारतात अनेक ठिकाणी मराठी भाषेचा वापर झाल्याचे संशोधनात आढळले आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी केंद्र सरकारला तब्बल सहाशे पुरावे दिले आहेत. केंद्र सरकारनेही याला मान्यता दिली आहे. तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम व उडिया भाषांना अभिजात भाषांच्या पंक्तीत मराठी जाणार आहे. मायमराठी ही जगातील एक समृद्ध परंपरा असलेली भाषा आहे. जगातील २० हजार भाषांत मराठी ही २० व्या क्रमांकाची भाषा आहे. इंग्रजीनंतर जगातील सर्वाधिक शब्दकोश मराठी भाषेतच आहेत. या भाषेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हे मराठी भाषेचेच आहेत; पण मराठीला आपणच कमी लेखत असल्यामुळे तिची हानी झाली आहे, अशी खंतही प्रा. नरके यांनी व्यक्त केली. प्रा. नरके म्हणाले, जीवनातील सर्व अंगे मराठीतून मांडली आहेत. ही भाषाच आपले ओळखपत्र आहे. या भाषेतच संत तुकारामांनी अभंग लिहिले. या अभंगांची मोहिनी जागतिक स्तरावरील लेखकांनाही आहे; पण आपण तुकाराम वाचत नाही. यावेळी अनुराधा मांडरे, बाबासाहेब वडगांवकर, राहुल मांडरे, वसंत कांबळे-लिंगनूरकर, दया मांडरे, आदी उपस्थित होते. मनीषा सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष भोसले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) अभिजात म्हणजे उच्चकुलिनांची भाषा नव्हे अभिजात म्हटले की ती उच्चकुलीन लोकांची भाषा, असा गैरसमज वर्षानुवर्षे आहे. काहींनी त्याची मांडणीही अशीच केली होती; पण अभिजात म्हणजे दर्जेदार, श्रेष्ठ; मग ते सर्वसामान्य व्यक्तीने का लिहिलेले असो, असे मतही प्रा. हरी नरके यांनी मांडले.