शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

Maharashtra Bandh : कोल्हापूर : बारा हजार वकिलांचा पाठिंबा, सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 19:00 IST

महाराष्ट्रभर चाललेल्या मराठा आरक्षणासंबंधी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहा जिल्ह्यांतील सुमारे बारा हजार वकिलांनी सहभाग घेत पाठिंबा दर्शविला. मोर्चात वकील सहभागी झाल्याने गुरुवारी दिवसभर सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज ठप्प राहिले. वकील आणि पक्षकारांनी न्यायालयाकडे पाठ फिरविल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार ६०० खटल्यांचे काम ठप्प राहिले.

ठळक मुद्देबारा हजार वकिलांचा पाठिंबा,मोर्चात उत्स्फूर्त सहभागसहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज ठप्प 

कोल्हापूर : महाराष्ट्रभर चाललेल्या मराठा आरक्षणासंबंधी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहा जिल्ह्यांतील सुमारे बारा हजार वकिलांनी सहभाग घेत पाठिंबा दर्शविला. मोर्चात वकील सहभागी झाल्याने गुरुवारी दिवसभर सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाज ठप्प राहिले. वकील आणि पक्षकारांनी न्यायालयाकडे पाठ फिरविल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार ६०० खटल्यांचे काम ठप्प राहिले.

कोल्हापुरात भव्य मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सहा जिल्ह्यांतील वकिलांनी न्यायालयीन काम बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधीचे पत्र कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या बार असोसिएशनला खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिले आहे. त्यानुसार गुरुवारी सहा जिल्ह्यांतील सुमारे बारा हजार वकील बंद व मोर्चामध्ये सहभागी झाले.

कोल्हापुरातून सुमारे २00 वकील ड्रेसकोडमध्ये सकाळी दहा वाजता दसरा चौकात एकत्र आले. मोर्चामध्ये सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत सर्व वकील आंदोलनस्थळी ठाण मांडून होते. इचलकरंजीमधील वकिलांनीही आंदोलनास पाठिंबा दर्शवित न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिल्याने येथील ३०० खटल्यांचे काम ठप्प झाले.

आंदोलनामध्ये खंडपीठ कृ ती समितीचे निमंत्रक व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, ज्येष्ठ वकील शिवाजीराव राणे, अजिम मोहिते, महादेव आडगुळे, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, रणजित गावडे, इंदिरा राजेपांढरे, प्रताप जाधव, आनंदराव जाधव, विलासराव दळवी, चंद्रकांत मोरे, प्रिया कुंडले, पूजा कटके, दिप्ती घाटगे, सरिता भोसले, आदींसह वकील सहभागी झाले होते.न्यायसंकुल परिसरात शुकशुकाटकसबा बावडा येथील न्यायसंकुल परिसरात वकील, पक्षकार, पोलीस यांची नेहमी वर्दळ असते. गुरुवारच्या बंदमध्ये वकिलांनी सहभाग घेऊन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही वकील, पक्षकार किंवा पोलीस न्याय संकुलाकडे दिवसभर फिरकलेच नाहीत. त्यामुळे याठिकाणी दिवसभर शुकशुकाट होता. 

 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूरCourtन्यायालय