शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine-जिल्ह्यातील १९८ केंद्रांवर लसटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:47 IST

CoronaVirus vaccine Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यासाठी अजूनही लस उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील २३६ लसीकरण केंद्रांपैकी केवळ ३८ केंद्रांवर शुक्रवारी अंशत: लसीकरण झाले. तब्बल १९८ केंद्रांवर लसीकरण बंद राहिले असून उर्वरित केंद्रांवरही शनिवारी लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १९८ केंद्रांवर लसटंचाईशनिवारी लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी अजूनही लस उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील २३६ लसीकरण केंद्रांपैकी केवळ ३८ केंद्रांवर शुक्रवारी अंशत: लसीकरण झाले. तब्बल १९८ केंद्रांवर लसीकरण बंद राहिले असून उर्वरित केंद्रांवरही शनिवारी लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवातीला संथपणे लसीकरण सुरू राहिले. परंतु ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची सरसकट परवानगी मिळाल्यानंतर मात्र जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सुरुवातीला लसीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करायला सुरुवात केली. अशातच येणारी लस अपुरी पडू लागली. गेले दोन दिवस जिल्ह्यात लसटंचाई निर्माण झाली आहे. दिवसभरामध्ये केवळ उपलब्ध असलेले सहा हजार डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे दुपारनंतर ही प्रक्रियाच बंद करण्यात आली.

शुक्रवारी दिवसभरामध्ये राज्य पातळीवर लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु राज्यभरातच टंचाई असल्याने आता लसीची प्रतीक्षा सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लस संपल्याचे फलक झळकत होते. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही नागरिकांनी फोन करून लसीबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली आहे.

चौकट

यड्रावकर यांच्याकडून प्रयत्न

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोल्हापूर जिल्ह्यातील लसटंचाईमध्ये लक्ष घातले असून त्यांनी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याकडून याबाबत माहिती घेतली. राज्याला काही लाख डोस उपलब्ध होत असून त्यांतील काही डोस जिल्ह्यासाठी देण्याचा प्रयत्न असून त्यासाठीच्या नियोजनासाठी वाहने तयार ठेवण्याच्या सूचना यड्रावकर यांनी केल्याचे सांगण्यात आले.

चौकट

दुसऱ्या डोसचे काय?

अनेकांनी मार्चमध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र तो डोस घेऊन महिना होत आला असताना लस संपली आहे. त्यामुळे हे नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाने नेमका दुसरा डोस कधी घ्यायचा याचा खुलासा करण्याची मागणी होत आहे. हा खुलासा करताना किमान दुसरा डोस घेणाऱ्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्याची मागणीही होत आहे.

चौकट

लसीकरणामध्ये राधानगरी अव्वल, तर हातकणंगले शेवटी

लसीकरणाच्या ४५ वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या डोसमध्ये राधानगरी तालुक्याने ६०.७१ टक्के लसीकरण करून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे; तर हातकणंगले २८.७० टक्के लसीकरण करून शेवटच्या स्थानावर आहे. चंदगड ५४.४२ टक्के, गगनबावडा ४७.४५, शाहूवाडी ४१.०३, कागल ३७.४०, आजरा ३७.०१, गडहिंग्लज ३६.०२, पन्हाळा २९.७१, शिरोळ २९.२८, भुदरगड २९.०५, करवीर २८.७९ अशी अन्य तालुक्यांतील टक्केवारी आहे. या वयोगटातील १५ लाख २३ हजार ३७२ लसीकरणाचे उद्दिष्ट असून त्यांपैकी ३३.५४ म्हणजे ५ लाख १० हजार ८९९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राधानगरी आणि चंदगड तालुक्यांनी लसीकरणामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल या तालु्क्यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूर