शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादांकडे एवढे पैसे येतात कुठून : क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 13:50 IST

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांत सणांबाबत जबरदस्ती करीत गप्प बसण्यासाठी अनेकांना ‘आत टाकण्या’ची भाषा वापरली .त्यानंतर त्याच तरुण मंडळांना लाखो रुपये वाटप केले आहेत. त्यांच्याकडे एवढ्या अल्पावधीत एवढे लाखो, कोटी रुपये आले कोठून, याबाबत पालकमंत्र्यांची ‘ईडी’ अर्थात सक्त अंमलबजावणी खात्यातर्फे चौकशी करावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्दे‘ईडी’मार्फत चौकशी करा; राजेश क्षीरसागर यांची मागणी एक हजार महिलांना हेल्मेट वाटप डॉ. विश्वनाथ गायक वाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेनेतर्फे कार्यक्रमसुनील मोदींचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांत सणांबाबत जबरदस्ती करीत गप्प बसण्यासाठी अनेकांना ‘आत टाकण्या’ची भाषा वापरली .त्यानंतर त्याच तरुण मंडळांना लाखो रुपये वाटप केले आहेत. त्यांच्याकडे एवढ्या अल्पावधीत एवढे लाखो, कोटी रुपये आले कोठून, याबाबत चंद्रकांतदादांची ‘ईडी’ अर्थात सक्त अंमलबजावणी खात्यातर्फे चौकशी करावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

स्वर्गीय डॉ. विश्वनाथ गायक वाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेनेतर्फे रविवारी सकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या महिलांना हेल्मेट वाटप कार्यक्रमप्रसंगी संयोजक म्हणून ते बोलत होते.

आमदार क्षीरसागर म्हणाले, मीही त्यांच्याबरोबरीने दोन टर्म आमदार आहे. मात्र, त्यांनी मंत्रिमंडळात स्थान पटकाविले. त्यानंतर लाखो, कोटींची उड्डाणे घेतली. गणेशोत्सवाच्या काळात अनेक तरुण मंडळे व तालमींच्या कार्यकर्त्यांना साउंड सिस्टीम लावू नका; नाहीतर चार-चार दिवस आत टाकीन. दिवाळीत फटाके फोडू नका; अन्यथा कारवाई करू, अशी जणू दादागिरीच सुरू केली आहे.

प्रत्येकाला पदे देण्याची भाषा आणि प्रत्येकाला पैशांमध्ये खरेदी करण्याची भाषा ते बोलत आहेत. त्यांचे असे बोलणे म्हणजे ते राज्याचे ट्रस्टी किंवा मालक असल्यासारखे वागत आहेत. मीही दोन वेळा आमदार झालो. त्यात तेही माझ्याबरोबरीने दोन्ही वेळेला आमदार म्हणून विधान परिषदेतून निवडून आले. त्यांच्याकडे त्यावेळी इतकी संपत्ती नव्हती. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यांनी मोठीच प्रगती केली आहे.

एवढे मोठे धन त्यांच्याकडे कोठून आले समजत नाही; त्यामुळे त्यांची सक्त अंमलबजावणी खाते अर्थात ‘ईडी’कडून चौकशी व्हावी. प्रथम मीही हेल्मेटला विरोध केला; कारण शाहूनगरीतील जनता कोणाचीही जोरजबरदस्ती ऐकून घेत नाही. त्यांच्यामध्ये जनजागृती करणे प्रशासनाचे काम होते; पण जबरदस्ती केल्याने मीही जनतेच्या बाजूने उभा राहिले. मात्र, मलाही कळते की, मनुष्याचे जीवन किती महत्त्वाचे आहे. त्यामुळेच मी व जितेंद्र गायकवाड यांच्या सहकार्याने शहरातील एक हजार महिलांना हेल्मेट वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला.

यावेळी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, युवा सेना राज्य उपाध्यक्ष पवन जाधव, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, परिवहन समितीचे सभापती नियाज खान, दिगंबर फराकटे, माजी महापौर मारुतीराव कातवरे, माजी उपमहापौर उदय पोवार, जितेंद्र गायकवाड, हर्षल सुर्वे, आदी उपस्थित होते.

मोदी आमच्यातहीमाजी नगरसेवक सुनील मोदी यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, नेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी निवेदकाने ‘जसे भाजपमध्ये पंतप्रधान मोदी आहेत, तसेच ब्रेन, बुद्धिवादी नेते म्हणून सुनील मोदी हेही आमच्यात ‘मोदी’ म्हणूनच आहेत, असे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

एक भगवा फिका पडला म्हणून गडद भगव्याकडे निघालो!पक्षप्रवेशानंतर माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी आपल्या भाषणात माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी सभागृहात येण्यापूर्वी ‘कुणाचा कडबा’ टाकण्यासाठी प्रवेश करणार, असा सवाल केला होता. त्यावर आपल्या भाषणात मोदी यांनी आपल्या भाषणात मी कुणाचा कडबा टाकण्यासाठी प्रवेश करीत नाही; तर मी राजकारणात येण्यापूर्वी हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. त्यात भाजप विद्यार्थी परिषद, हिंदू एकता, आदींमध्ये कार्य केले आहे.

भाजपमधील भगव्याचा रंग फिका पडला असून राज्याला दिशा देण्याचे काम ‘गडद भगवा’ अर्थात शिवसेना करणार आहे. मी कुठल्याही पदाच्या अपेक्षेने प्रवेश केलेला नाही. मी संघटना मजबूत करण्यासाठी पक्षप्रवेश केला आहे. यापुढे भाजपमधून माझ्यासह अनेक कार्यकर्ते सेनेत दाखल होतील, असे सूतोवाचही त्यांनी आपल्या भाषणात केले. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण