शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर --आठ जागांवर शिवसेनेची हवा ! जिल्ह्यातील चित्र : मोठे यश मिळण्याची शक्यता;

By admin | Updated: October 16, 2014 00:48 IST

मतदानात करवीर पुढे, तर कोल्हापूर शहर मागे.. राष्ट्रवादीला बसणार फटका

विश्वास पाटील - कोल्हापूर -विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी सायंकाळी मतदान झाल्यानंतर लोकांना आता गुलाल कुणाला, याचे वेध लागले आहेत. मतदारसंघात आज तयार झालेले वातावरण, पडद्याआड झालेल्या घडामोडी, मतदानाचा वाढलेला टक्का, प्रस्थापितांच्या विरोधातील नाराजी, जातीच्या राजकारणाची उसळी आणि पैशासह सर्व आयुधांचा वापर याचा मतदानावर परिणाम होणार हे विचारात घेतले तरी आजच्या घडीला शिवसेनेच्या जिल्ह्यातील दहांपैकी आठ जागा विजयाच्या स्पर्धेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.  राधानगरी व शिरोळची जागा शिवसेनेने जिंकली असल्याचेच चित्र त्या त्या मतदारसंघात होते. निकाल बदलला तर करवीर, कागल, चंदगड आणि शाहूवाडी या मतदारसंघांतही खळबळ उडू शकते. मावळत्या विधानसभेत कोल्हापूर उत्तर, करवीर आणि हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. या जागा निवडणूक स्पर्धेत आहेतच; शिवाय राधानगरी, शिरोळसह, कागल, चंदगड आणि शाहूवाडी या मतदारसंघांतही शिवसेनेचे उमेदवार स्पर्धेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला दोन ठिकाणी, तर काँग्रेसला शिरोळमध्ये त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचेच पारडे जड ठरत आहे. करवीर मतदारसंघात काँग्रेसचे पी. एन. पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांच्यात तुल्यबळ लढत झाली. तिथे ‘जनसुराज्य’चे राजू सूर्यवंशी व भाजपचे केरबा चौगले यांची मतांची झेप किती, यावर गुलाल कुणाला हे ठरणार आहे. अशीच स्थिती कागलमध्ये हसन मुश्रीफ व शिवसेनेचे संजय घाटगे यांच्या लढतीत आहे. या लढतीचा अंदाज बांधणे अवघड बनले आहे. चंदगड मतदारसंघात आमदार संध्यादेवी कुपेकर विरुद्ध शिवसेनेचे नरसिंगराव पाटील यांच्यातच चुरस झाली. हातकणंगले मतदारसंघात कालपर्यंत काँग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे हे पुढे असल्याचे वातावरण होते; परंतु अखेरच्या दोन दिवसांत बऱ्याच उलथापालथी झाल्या. त्यामुळे आज मतदानानंतर तिथे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची हवा झाली. शाहूवाडी मतदारसंघात विनय कोरे यांना शिवसेनेचे सत्यजित पाटील यांनी जोरदार लढत दिल्याचे स्पष्ट झाले आहे. रेसमधील जागा..राधानगरी:प्रकाश आबिटकरशिरोळ:उल्हास पाटीलहातकणंगले:सुजित मिणचेकरकोल्हापूर उत्तर:राजेश क्षीरसागरकरवीर:चंद्रदीप नरकेचंदगड:नरसिंगराव पाटीलकागल:संजयबाबा घाटगेशाहूवाडी:सत्यजित पाटीलशिवसेनेचे वारे कशामुळे ?जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचे वारे वाहण्यामागे काही कारणे आहेत. त्यातील प्रस्थापितांच्या विरोधातील सुप्त लाट हे एक महत्त्वाचे कारण आहे. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक गट शिवसेनेत गेल्याने कागलसह राधानगरी व चंदगड मतदारसंघांत शिवसेना मजबूत झाली. दोन्ही काँग्रेसला पर्याय म्हणून शिवसेनेलाच लोकांनी पसंती दिली. मुख्यत: तरुणांत या पक्षाबद्दल कायमच आकर्षण असते. मतदानात करवीर पुढे, तर कोल्हापूर शहर मागेकोल्हापूर : दहापैकी सर्वांत कमी मतदान कोल्हापूर उत्तर मतदारसंघात (६२ टक्के) झाले. शेजारच्या करवीर मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वांत जास्त ८४.३७ टक्के मतदान झाले. लोकांनी मतदानासाठी जास्तीत जास्त बाहेर पडावे यासाठी सर्वाधिक जागृती शहरात होते. मतदार केंद्रेही जवळ असतात. मतदानास जाण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध असतात. मतदार सुशिक्षित असतो. शिवाय आज सुटी असल्याने मतदान जास्त टक्क्यांनी होण्यास अडचण नव्हती. असे असूनही या मतदारसंघात सगळ्यांत कमी मतदान झाले. लढतीत तुलनेत कमी चुरस होती आणि ग्रामीण भागात जसे हाताला धरून मतदान बाहेर काढता येते, तसे शहरात करता येत नाही, हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. गावात अजूनही राजकारणाबद्दल टोकाची ईर्षा असते. त्यामुळे आपला ‘साहेब’ आला पाहिजे, यासाठी एकेक मतासाठी आटापिटा होतो; तसे शहरात घडत नाही.