शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

कोल्हापूर : शेतकरी संघटनेने ठोकले साखर सहसंचालक कार्यालयास टाळे, सांगलीतील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 4:34 PM

साखर कारखान्यांना ऊस पाठवून दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांना अद्याप एफआरपी प्रमाणे पैसे मिळालेले नाहीत. हातात पैसे नसल्याने शेतकरी अडचणीत असताना साखर विभाग याबाबत काहीच कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.

ठळक मुद्दे‘एफआरपी’ थकवल्याने कोल्हापूर,सांगलीतील शेतकरी आक्रमक पोलीसांची तारांबळ

कोल्हापूर : साखर कारखान्यांना ऊस पाठवून दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांना अद्याप एफआरपी प्रमाणे पैसे मिळालेले नाहीत. हातात पैसे नसल्याने शेतकरी अडचणीत असताना साखर विभाग याबाबत काहीच कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक टाळे ठोकल्याने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले. बहुतांशी कारखान्यांनी पहिल्या महिन्यातील गाळप झालेल्या ऊसाचे पैसे आदा केले आहेत. उर्वरित बिले न दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच साखरेचे दर कमी झाल्याने साखर कारखान्यांनी एफआरपी मध्ये मोडतोड करून प्रतिटन २५०० रूपये पहिली उचलीची घोषणा केली आहे.

 कार्यालयासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.(छाया- आदित्य वेल्हाळ)

कायद्याने ऊस गाळपास आल्यानंतर चौदा दिवसात एफआरपी प्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे, पण साखर आयुक्त कार्यालय याबाबत कारखान्यांवर काहीच कारवाई करत नाही.

या निषेधार्थ सोमवारी दुपारी रघूनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील व युवा संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर कार्यालयातील कर्मचाºयांना बाहेर काढून टाळे ठोकले आणि तेथून निघून गेले.लक्ष्मीपुरी पोलीसांचा फौजफाटा तिथे दाखल झाला. त्यांनी पंचनामा करून कुलूप तोडले, संबधितांवंर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, सोमवारी आंदोलन करणार असल्याचे ‘अंकुश’ संघटनेने पोलीसांना कळविले होते, त्यांचे रद्द पण शेतकरी संघटनेच्या अचानक झालेल्या आंदोलनाने पोलीसांची तारांबळ उडाली.कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की!संघटनेचे कार्यकर्ते कार्यालयात आल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. कर्मचारी जागेवरून उठेपर्यंत त्यांनी हाताला धरून कार्यालया बाहेर काढल्याने गोंधळ उडाला. यामध्ये कनिष्ठ लिपीक आर. एस. उपाध्ये यांना धक्काबुक्की झाली.

ऊन्हात बसूनच केले जेवणसंघटनेचे कार्यकर्ते कुलूप लावून लगेच जीप मधून निघून गेल्याने कर्मचाऱ्यांना तिसऱ्या मजल्यावरील टेरीसचा आसरा घ्यावा लागला. पोलीस येऊन पंचनामा करून कुलूप तोडू पर्यंत दोन तास गेल्याने रखरखत्या उन्हातच कर्मचाऱ्यांना उभे राहावे लागले. सहकार अधिकारी विजय वाघमारे हे शुगरचे पेशंट आहे. वेळेत जेवण घ्यावे लागत असल्याने त्यांनी चक्क उन्हात बसूनच जेवण केले.

 

ऊस गाळप होऊन दोन महिने झाले, तरी अद्याप पैसे मिळालेले नाहीत. साखरेच्या दरातील घसरणीमुळे एफआरपीचे तुकडे सुरू केले आहेत. हे बेकायदेशीर असताना साखर विभाग संबधितांवर काहीच कारवाई करत नसेल तर त्यांना कशाला पोसायचे? म्हणून टाळे ठोकले.- हणमंत पाटील,सांगली जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

 

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूरSangliसांगली