शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

कोल्हापुरात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसच्या पुढाकारानेच स्थापन झालेल्या स्थानिक विकास आघाड्यांचे वर्चस्व राहिले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसच्या पुढाकारानेच स्थापन झालेल्या स्थानिक विकास आघाड्यांचे वर्चस्व राहिले. एकूण ४३३ पैकी २७ निवडणुका बिनविरोध झाल्या. ३८६ पैकी तब्बल २३२ ठिकाणी स्थानिक आघाड्यांना गुलाल मिळाला. तब्ब्ल १२५ ठिकाणी मतदारांनी सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत सत्तांतर घडवले. कागल तालुक्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. भाजपने ३० ग्रामपंचायतींवर कब्जा करत जिल्ह्याच्या राजकारणात अस्तित्व कायम राखले.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यापैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. प्रत्यक्षात ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ८३.६० टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी आठपासून तालुक्याच्या ठिकाणी मतमाेजणी करण्यात आली. सकाळी नऊ वाजल्यापासून निकाल लागण्यास सुरुवात झाली. जसे निकाल बाहेर येऊ लागले तसे विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

मतदान झालेल्या ३८६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २३२ ठिकाणी स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला राहिला, तर १५५ ठिकाणी पक्षीय झेंड्याखाली ग्रामपंचायतींची सत्ता आल्या. यंदा सत्तांतराचा आकडाही वाढला असून १२५ ठिकाणी प्रस्तापितांना लोकांना झिडकारले आहे.

हसन मुश्रीफच कागलचे श्रावणबाळ

कागल तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींमध्ये विजयी संपादन करून आपण अजूनही कागल तालुक्याचे श्रावणबाळ असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखवून दिले.

सहा ठिकाणी सत्तेचे त्रांगडे

शिरोळ तालुक्यात तीन, करवीरमध्ये दोन तर आजरा तालुक्यात एका ठिकाणी मतदारांनी कोणालाच सत्ता न दिल्याने त्रिशंकू अवस्था झाली आहे. अपक्षांमुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

मतमोजणी केंद्रावरही ‘लिंबू-भंडारा’

ग्रामपंचायत निवडणुकीत कमालीची इर्षा पाहावयास मिळाली. मतदानाच्या दिवसापर्यंत भानामतीचे प्रकार सुरू राहिल्याने सत्ता संघर्ष उफाळून आला होता. यातूनच ‘लिंबू-भंडारा’ थेट मतमोजणी केंद्रापर्यंतही पोहोचले होते.

अनेक वर्षांच्या सत्ता उलथून लावल्या

एका एका ग्रामपंचायतीवर २०-२५ वर्षे एकहाती सत्ता राखणाऱ्यांना यंदा मतदारांनी झिडकारले आहे. करवीर तालुक्यातील आमशी, खुपिरे तर राधानगरी तालुक्यतील तळाशी ग्रामपंचायतीमधील अनेक वर्षांची सत्ता मतदारांनी उलथून लावली आहे.

बालिंगेत दिग्गजांचा धक्कादायक पराभव

शहरालगतची ग्रामपंचायत असल्याने बालिंगेची निवडणूक ‘लाख’ मोलाची झाली. येथे माजी सरपंच अनिल पोवार व श्रीकांत भवड या दिग्गजांना मतदारांनी नाकारले. ‘मनसे’चे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील यांच्या आघाडीचाही दारूण पराभव झाला.

फोटो ओळी : सोमवारी करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे मतमोजणी कसबा बावडा, रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये झाली. मोजणी केंद्रात एका कार्यकर्त्यांकडून पोलिसांनी लिंबू-भंडारा जप्त केला. (फाेटो-१८०१२०२१-कोल-करवीर)