शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसच्या पुढाकारानेच स्थापन झालेल्या स्थानिक विकास आघाड्यांचे वर्चस्व राहिले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसच्या पुढाकारानेच स्थापन झालेल्या स्थानिक विकास आघाड्यांचे वर्चस्व राहिले. एकूण ४३३ पैकी २७ निवडणुका बिनविरोध झाल्या. ३८६ पैकी तब्बल २३२ ठिकाणी स्थानिक आघाड्यांना गुलाल मिळाला. तब्ब्ल १२५ ठिकाणी मतदारांनी सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत सत्तांतर घडवले. कागल तालुक्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. भाजपने ३० ग्रामपंचायतींवर कब्जा करत जिल्ह्याच्या राजकारणात अस्तित्व कायम राखले.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यापैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. प्रत्यक्षात ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ८३.६० टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी आठपासून तालुक्याच्या ठिकाणी मतमाेजणी करण्यात आली. सकाळी नऊ वाजल्यापासून निकाल लागण्यास सुरुवात झाली. जसे निकाल बाहेर येऊ लागले तसे विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

मतदान झालेल्या ३८६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २३२ ठिकाणी स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला राहिला, तर १५५ ठिकाणी पक्षीय झेंड्याखाली ग्रामपंचायतींची सत्ता आल्या. यंदा सत्तांतराचा आकडाही वाढला असून १२५ ठिकाणी प्रस्तापितांना लोकांना झिडकारले आहे.

हसन मुश्रीफच कागलचे श्रावणबाळ

कागल तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींमध्ये विजयी संपादन करून आपण अजूनही कागल तालुक्याचे श्रावणबाळ असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखवून दिले.

सहा ठिकाणी सत्तेचे त्रांगडे

शिरोळ तालुक्यात तीन, करवीरमध्ये दोन तर आजरा तालुक्यात एका ठिकाणी मतदारांनी कोणालाच सत्ता न दिल्याने त्रिशंकू अवस्था झाली आहे. अपक्षांमुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

मतमोजणी केंद्रावरही ‘लिंबू-भंडारा’

ग्रामपंचायत निवडणुकीत कमालीची इर्षा पाहावयास मिळाली. मतदानाच्या दिवसापर्यंत भानामतीचे प्रकार सुरू राहिल्याने सत्ता संघर्ष उफाळून आला होता. यातूनच ‘लिंबू-भंडारा’ थेट मतमोजणी केंद्रापर्यंतही पोहोचले होते.

अनेक वर्षांच्या सत्ता उलथून लावल्या

एका एका ग्रामपंचायतीवर २०-२५ वर्षे एकहाती सत्ता राखणाऱ्यांना यंदा मतदारांनी झिडकारले आहे. करवीर तालुक्यातील आमशी, खुपिरे तर राधानगरी तालुक्यतील तळाशी ग्रामपंचायतीमधील अनेक वर्षांची सत्ता मतदारांनी उलथून लावली आहे.

बालिंगेत दिग्गजांचा धक्कादायक पराभव

शहरालगतची ग्रामपंचायत असल्याने बालिंगेची निवडणूक ‘लाख’ मोलाची झाली. येथे माजी सरपंच अनिल पोवार व श्रीकांत भवड या दिग्गजांना मतदारांनी नाकारले. ‘मनसे’चे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील यांच्या आघाडीचाही दारूण पराभव झाला.

फोटो ओळी : सोमवारी करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे मतमोजणी कसबा बावडा, रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये झाली. मोजणी केंद्रात एका कार्यकर्त्यांकडून पोलिसांनी लिंबू-भंडारा जप्त केला. (फाेटो-१८०१२०२१-कोल-करवीर)